वाहन बाजाराला दुष्काळाचा चटका

Dasara-Muhurt
Dasara-Muhurt

औरंगाबाद - पावसाची गैरहजेरी वाहन बाजारालाही चटका लावणारी ठरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चारचाकी विक्री पूर्ण थंडावली आहे. दुपारपर्यंत विविध शोरूम्समध्ये कार विक्रीने दोन अंकी मजलदेखील मारली नव्हती. लाखाच्या आतल्या किमतीच्या दुचाकी विक्रीवर मात्र याचा फारसा परिणाम जाणवला नाही. 

दुचाकी घेऊ इच्छिणाऱ्यांवर यंदा दुष्काळी स्थितीचा परिणाम काही जाणवला नाही. दसऱ्याच्या मुहूर्तासाठी केलेले बुकिंग आणि ताजी विक्री मिळून आजच्या दिवसांत शहरातील एकेका शोरूमने तीनशे ते चारशे दुचाकी विकल्याचे निदर्शनास आले आहे; मात्र चारचाकी गाड्यांची बुकिंगची डिलिव्हरी वगळता नवी खरेदी औरंगाबादकरांनी फारशी केली नाही. मारुती, महिन्द्रा, ह्युंदाई, होन्डा आदी सर्वच प्रमुख वाहन कंपन्यांच्या शोरूममध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा व्यवहार कमीच झाल्याचे तेथील व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी सांगितले. सेकंड हॅंड वाहनांची विक्री करणाऱ्या बाजारांत दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या व्यवहारात फारशी तेजी आढळली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com