हुतात्मा जवानांना वंदन करण्यासाठी औरंगाबादेत जनसागर (व्हिडिओ)

army
army

औरंगाबाद : काश्‍मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेले जवान नितीन राठोड आणि संजय राजपूत यांचे पार्थिव आज (शनिवार) औरंगाबादमध्ये दाखल झाले. यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. 

औरंगाबादहून बुलडाण्यातील मूळ गावी या दोघांचे पार्थिव नेण्यात येणार आहे. यावेळी 'हुतात्मा जवान अमर रहे'च्या घोषणा जमलेल्या नागरिकांनी दिल्या. 

मलकापूर : येथील  संजयसिंह राजपूत यांच्यावरील अंत्यसंस्कारांची तयारी जवळपास प्रशासनाकडून पूर्ण होत आलेली आहे. नगर पालिकेच्या मैदानावर त्या ठिकाणी प्रशासनाकडून साफसफाई करण्यात येत आहे. आज सकाळी 8 पर्यंत पार्थिव औरंगाबादला आणले गेले.

नंतर शहरातून अंत्ययात्रा काढण्यात येणार असून साधारण 4 वाजता अंत्यसंस्कर करण्यात येणार आहेत. हुतात्मा जवान संजयसिंह राजपूत यांच्या अंत्यसंस्कारासाठी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रेदींय मंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री मदन येरावार सह आणखी दोन तीन मंत्री, खासदार, आमदार मलकापूर येथे येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com