'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 310 कोटींची कर्जमाफी !

Debt waiver for aurangabad
Debt waiver for aurangabad

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी) जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्हा बॅंक व महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या माध्यमातून 1 फेब्रुवारीपर्यंत 1 लाख 20 हजार 157 शेतकऱ्यांना 310 कोटी 88 लाख 30 हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे.

ही प्रक्रिया नियमित सुरू असून कर्जवाटप प्रक्रियेत या दोन्ही बॅंकांनी सातत्य ठेवल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली. 

ही योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न शासनातर्फे होत आहे. प्रत्येक महिन्याला किती कर्जमाफीची रक्‍कम वाटप झाली, याची माहिती या कार्यालयास देणे बंधनकारक असल्याने केवळ जिल्हा मध्यवर्ती आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅंका सातत्याने याची संपूर्ण आकडेवारी वेळोवेळी देत असतात. मात्र सर्वाजनिक बॅंका आणि खासगी बॅंकांतर्फे कर्ज वाटपाच्या प्रक्रियेत कसल्याच हालचाली दिसत नाही. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या तक्रारी आमच्या कार्यालयाकडे येत असल्याची माहिती श्री. दाबशेडे यांनी दिली. 

 

बॅंक लाभार्थी कर्जमाफीची रक्‍कम 
जिल्हा बॅंक 1 लाख 6 हजार 329 196 कोटी 67 लाख रुपये 
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक 13 हजार 828 114 कोटी 21 लाख रुपये 
एकूण 1 लाख 20 हजार 157 310 कोटी 88 लाख 30 हजार रुपये
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com