नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जानापूरी (ता. लोहा) येथे बुधवारी (ता. २१) पहाटे दीडच्या सुमारास घडली.
लोहा तालुक्यातील जानापूरी येथे राहणारे शेतकरी तुकाराम ग्यानोबा कदम (वय ४०) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. यामुळे शेतातील उत्पन्न घटले. तरीही खचुन न जाता त्यांनी बँकेचे कर्ज काढले. परंतु या कर्जाची परतफेड त्यांना वेळेत करता येत नसल्याने ते चिंताग्रस्त झाले होते. त्यातच घरगाडा कसा चालवायाचा या दुहेरी संकटात सापडलेल्या या तरूण शेतकऱ्यांनी आपल्या राहत्या घरी बुधवारी (ता. २१) पहाटे दीडच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
सोनखेड ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी बंडे यांनी घटनास्थाळाला भेट दिली. याप्रकरणी सोनखेड ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.