जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग बंद 

जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग बंद 

जायकवाडी, (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणातून तसेच जलविद्युत केंद्रातून गोदापात्रात पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात तेरा दिवसांपासून धरणाच्या सांडव्याच्या वक्राकार आठ दरवाजांद्वारे 4192 क्‍युसेकने रात्रंदिवस पाणी सोडणे सुरू होते.

मराठवाड्यात पर्जन्यमान अत्यल्प असले तरी नाशिक परिसरात चांगला पाऊस झाल्याने हे पाणी धरणात येऊन, जायकवाडीत 92 टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे धरणातून गोदापात्रात पाणी सोडण्यात आले. आता पाऊस बंद झाल्याने धरणात येणारे पाणीही बंद झाले. बुधवारी (ता. 28) रात्री दहाच्या सुमारास जलविद्युत केंद्रातून 1590 क्‍युसेकने सोडलेले पाणी बंद करण्यात आले. धरणाच्या उजव्या कालव्यातून 900 क्‍युसेकने, डाव्या कालव्यातून 1800 क्‍युसेकने पाणी खरीप सिंचनासाठी सुरू आहे. 

जायकवाडीतून गोदापात्रात पाणी सोडण्यात आले. या गोदापात्रावर पैठणपासून ते नांदेडपर्यंतच्या विष्णुपुरी बंधाऱ्यापर्यंत एकूण 11 उच्च पातळीचे बंधारे आहेत. त्यात आजघडीला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सध्या पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा काही प्रमाणात प्रश्न मिटला आहे. 


धरणातील पाणीसाठा 84.60 टक्के 
सध्या जायकवाडी धरणातून, जलविद्युत केंद्रातूनही पाणी बंद करण्यात आले आहे. पुढील आदेश आल्यावर येथील जलविद्युत केंद्र सुरू होऊ शकते. सध्या जायकवाडी धरणात 84.60 टक्के इतका पाणीसाठा असून, धरणाच्या उजव्या कालव्यातून गुरुवारी (ता. 29) सकाळी आठपर्यंत 41.45 दलघमी विसर्ग करण्यात आला. त्यातील काही पाणी माजलगाव धरणात साठलेले असून, कालव्यातून सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. डाव्या कालव्यातून 58.92 दलघमी विसर्ग करण्यात आला. सध्याही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com