डॉ. व्दारकादास लोहिया यांचे निधन

dr.lohiya
dr.lohiya

अंबाजोगाई - गरिब व वंचित घटकांसाठी आपले आयुष्य झिजविलेला संघर्षयात्री डॉ. व्दारकादास शालिग्राम लोहिया उर्फ बाबूजी (८१) यांचे शुक्रवारी (ता. २३) रात्री अकराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी दुपारी २ वाजता मानवलोक संस्थेच्या परिसरात अंत्यविधी करण्यात येणार आहे.

बाबूजींच्या जाण्याने मराठवाडाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातील जलसंधारण, सामाजिक चळवळ पोरकी झाली असून उपेक्षित, निराधारांचा आधार हरवल्याची भावना निर्माण झाली आहे. डॉ. द्वारकदासा लोहिया हे गेल्या १५ दिवसापासून आजारी होते. अंबाजोगाईच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी (ता.२२) त्यांची प्रकृती आणखी खालावली. अखेर त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले होते.

भाऊबीजेला (ता. नऊ) त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या घरच्याच डॉ. शुभदा लोहियांच्या रूग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर चार दिवसांनी (ता. १४) आणखी प्रकृती खालावल्याने त्यांना जवळच्याच केअर सेंटरमध्ये दाखल केले. तरीही त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होत राहिले. 

शुक्रवारी सकाळपासून त्यांच्या डोळ्याचे, मुत्रपिंडाचे व मेंदूचे कार्य थांबले होते. तर, ऱ्हदयाचे कार्य मात्र सुरु होते. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या आसपास त्यांना घरी हलविण्यात आले. त्यानंतर घरी पोचताच काही वेळात त्यांचा मृत्यू झाला. 

मानवलोक या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साडेचार दशकं विविध सामाजिक उपक्रम राबविले. मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित व परित्यक्त्या महिलांना आधार दिला. गरिब व निराधारांचाही ते आधार होते. असा हा गरिबांचा आधारवडच सर्वांना सोडून गेल्याची भावना जनमानसात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com