मराठवाड्यात 56 तालुक्‍यांत खोल खोल पाणी 

Representational Image
Representational Image

औरंगाबाद : मागील काही वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसह शेतमजुरांवर पुन्हा एकदा परिस्थितीशी दोन हात करण्याची वेळ आली आहे.

मराठवाड्यातील 56 तालुक्‍यांतील पाणी खोल गेले असून, 51 तालुक्‍यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतातील पिके पार उद्‌ध्वस्त झाली असून बागायती शेतीसाठी विहिरीमध्ये पाणीच नसल्याने डोक्‍याला हात लावण्याची वेळ आली आहे. 

यंदा चांगला पाऊस होणार, असे भाकीत पेरणीपूर्वीच हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकरी वेळीच कामाला लागला. मात्र, पावसाने दगा दिल्याने काही भागांत दुबार, तर काही ठिकाणी तिबारही पेरणी करावी लागली. एवढे सर्व करूनही पदरात मुद्दल खर्चही पडलेला नाही. दुसरीकडे विहिरीमध्येही पाणीच नसल्याने फळबागा जगवायच्या कशा, असा प्रश्‍न उभा राहिला आहे.

नुकत्याच केलेल्या भूजल सर्वेक्षणात 875 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. त्यात ही स्थिती आढळली. शिवाय या वेळी अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये 37 तालुक्‍यांचा समावेश आहे. पावसाचे घटते प्रमाण आणि त्यामुळे खोलवर जात असलेली भूजल पातळी मोठे संकट उभे होत असल्याचे संकेत देत आहेत. मराठवाड्यातील प्रमुख असलेल्या गोदावरी, पूर्णा, मांजरा, सीना, भीमा, पैनगंगा या नदीपात्रांची अवस्थादेखील वाईट आहे. 

मराठवाड्यातील अनेक भागांत आजही पिण्यासाठीच पाणी मिळेनासे झाले आहे. आतापर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सरकारी यंत्रणा सोडवू शकली नाही. त्यामुळे सिंचनासाठी काय काम होत असेल, याचा अंदाज लावता येतो. मराठवाड्यातील स्थितीला निसर्गासोबतच सरकारी यंत्रणादेखील जबाबदार असल्याचा आरोप आता शेतकऱ्यांमधून केला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com