औरंगाबाद : कायम वर्दळ असलेले ठिकाण म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय. विविध कागदपत्रे तयार करून घेण्यासाठी या कार्यालयासह या भागात कायम गर्दी झालेली असते; मात्र चक्क मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचे बनावट आधारकार्ड येथे एका एजंटकडून तयार करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. धनादेश अनादर प्रकरणी दाखल दाव्यात बनावट कागदपत्रांआधारे 2012 मध्ये मरणपावलेल्या व्यक्तीच्या नावावर डमी जामीनदार उभा करून जामीन मिळविल्याप्रकरणातील आरोपीने येथील एजंकडूनच हे आधारकार्ड 500 रुपयांत बनवून घेतले आहे. त्यामुळे या परिसरात बनावट आधारकार्ड काढून देणाऱ्यांची टोळीच असल्याची शक्यता आहे.
वरील प्रकरणात कचरू खिल्लारे (44, रा. रमानगर) याने मृत व्यक्तीच्या नावावर डमी जामीनदार उभा करून जामीन मिळवित न्यायालयाची फसवणूक केली होती. आरोपीने जयराम खिल्लारे यांच्या नावे असलेले मात्र त्यावर जयकर गडवे याचा फोटो असलेले बनावट मतदान ओळखपत्र संशयिताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एजंट अजीजभाई याच्याकडून 500 रुपयांत तयार करून घेतल्याचे कबुली दिली असून, ते ओळखपत्र कचरू खिल्लारे व साथीदारांनी पेट्रोल टाकून जाळल्याचीदेखील त्याने सांगितले. प्रकरणात तो पोलिस कोठडीत आहे. या कोठडीत सोमवारपर्यंत (ता.16) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. एम. पोतदार यांनी शनिवारी (ता.14) दिले.
हे आहे मुळ प्रकरण?
प्रकरणात शिवकुमार हिरालाल कावळे (41, रा. गवळीपुरा, छावणी) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, प्रकरणातील राजू कांबळेला तीन लाख रुपये दिले होते. प्रकरणात परतावा करण्यासाठी त्याने दिलेला धनादेश वटला नाही. प्रकरणी न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतर खिल्लारे व त्याच्या मित्राने बनावट कागदपत्रे दाखल करून जामीन मिळविला होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.