नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

hingoli photo
hingoli photo

वसमत (जि. हिंगोली) :  सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोली (ता. वसमत) येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. २७) घडली. दरम्यान, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यावर किती रुपयांचे कर्ज होते, हे मात्र समजू शकले नाही.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील अकोली येथील शेतकरी तुकाराम बाभनराव सावंत (वय ५०) यांनी विष पिऊन आत्‍महत्या केली. या बाबत रघुनाथ सावंत यांच्या तक्रारीवरून वसमत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तुकाराम सावंत यांना चाळीस गुंठे जमीन आहे. त्यांच्यावर किती कर्ज होते याची माहिती मिळू शकली नाही. त्‍यांच्या पश्चात आई, पत्‍नी, एक मुलगा, सहा मुली आहेत. त्‍यापैकी चौघींचे लग्न झाले आहे.

गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

हिंगोली : भानखेडा तांडा (ता. सेनगाव) येथे बाहेरगावांवरून आलेल्यांना क्‍वारंटाइन केल्याच्या कारणावरून व्हीआरआरटी पथकासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २८) गुन्हा दाखल झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिली.

हट्टा पोलिस ठाण्यात कारवाई

सेनगाव तालुक्‍यातील भानखेडातांडा येथे दिनकर पवार, बबन पवार यांना क्‍वारंटाइन का केले म्‍हणून अंकुश पवार व विजय पवार यांनी व्हीआरआरटी पथकातील सदस्यांना अश्लील भाषा वापरली. यावरून पथकाच्या अध्यक्षा तथा सरपंच ज्‍योती कोटकर यांनी दिलेल्या पत्रावरून हट्टा पोलिस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे. 

माळहिवरा येथे एकास मारहाण

हिंगोली ः तालुक्‍यातील माळहिवरा येथे १४ दिवसांचा क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर विहिरीवर पाण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थास मारहाण झाल्याची घटना बुधवारी (ता. २७) घडली. यात वाद सोडविण्यास गेलेल्यांनादेखील मारहाण झाली आहे. परंतु, त्‍याची नावे समजली नाहीत. या घटनेतील जखमी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे.

रेशन दुकानाचा परवाना रद्द

हिंगोली:  रास्त भाव दुकानदार, गावकऱ्यांना राशन देत नसल्याच्या तक्रारीवरून जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांनी तालुक्यातील दुर्गधामणी येथील रास्त भाव दुकानदारावर निलबंनाची कार्यवाही करीत परवाना रद्द केला आहे.

तहसीलदारांनी केली चौकशी

रास्त भाव दुकानदार सात ते आठ वर्षांपासून गावकऱ्यांना व्यवस्थित माल वाटप करत नाहीत. तसेच लॉकडाउनच्या काळात पाच किलो मोफत तांदूळ वाटप केले नाही. तसेच वाद घालणे, मारहाण करणे, खोट्या केसेसच्या धमक्या देणे आदी प्रकार दुकानदाराकडून घडत असल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी रिपब्लिकन सेना जिल्हा प्रमुख किरण घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली तक्रार सादर केली होती. यावरून तहसीलदार गजानन शिंदे, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी दुर्गधामणी येथे भेट देऊन चौकशी केली. त्यावरून पंचनामा व चौकशीअंती बुधवारी (ता. २७) रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द केला आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com