विषाची बाटली सोबत घेऊन शेतकरी दांपत्याचा ठिय्या

विषाची बाटली सोबत घेऊन शेतकरी दांपत्याचा ठिय्या

पाथरी - रेणुका शुगर साखर कारखाना ऊस नेत नसल्याने चाटेपिंपळगाव (ता. पाथरी) येथील शेतकरी दांपत्य नीता व रमेश रावसाहेब काळे यांनी सोमवारी (ता. १४) विषाची बाटली सोबत घेऊन कारखाना गाठत आत्महत्येचा इशारा दिला. यावेळी कारखाना प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. आजच ऊस नेण्यात येईल, असे आश्वासन दिले. परंतु शेतकरी दांपत्याने ऊस जाईपर्यंत अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडला.

मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला असताना, साखर  कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा लावली जात आहे. शेतामध्ये उभा असलेला ऊस नेण्यासाठी कारखाने टाळाटाळ करतात. तर कारखान्यातील कर्मचारी ओळखीतील लोकांचा किंवा ‘चिरीमिरी’ मिळाली तरच ऊस नेण्यासाठी लवकर नंबर लावतात. याला कंटाळून चाटेपिंपळगाव येथील शेतकरी दांपत्य नीता व रमेश काळे यांनी सोमवारी सकाळी साडेदहाला रेणुका शुगर या साखर कारखान्यातील अधिकाऱ्याच्या दालनात विषाची बाटली घेऊन ठिय्या मांडला. ऊसतोड करून कारखान्यात आणा अन्यथा येथेच आत्महत्या करू, असा पवित्रा या दांपत्याने घेतल्याने कारखाना प्रशासनाची भंबेरी उडाली.

यापूर्वीही कारखान्याला ऊस घेऊन जा, अशी विनंती केली होती. त्यासाठी आत्मदहन करण्याचा इशाराही दिला होता. परंतु कारखान्याने प्रकरण गांभीर्याने न घेतल्याने, शेवटी कंटाळून या जोडप्याने हा मार्ग अवलंबला आहे. या प्रकाराची पाथरी शहरासह जिल्ह्यात चर्चा होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com