हिंगोली: कर्जाच्या चिंतेमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

farmer suicide
farmer suicide

हिंगोली : वसमत तालुक्यातील रेणकापूर येथील एका शेतकऱ्याने कापसावरील शेंदरी बोंडआळी मुळे उत्पादन घटणार असल्याने बँकेचे कर्ज कसे फेडावे या चिंतेमुळे विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी ( ता. ५ ) रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील रेणकापूर येथील सोपान बळीराम रेंगे (वय५२) यांना एकत्रित कुटूंबामधे सुमारे पंधरा एकर शेत आहे. या शेतात त्यांनी पेरणीसाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वसमत या बँकेचे कर्ज घेतले होते. मात्र यावर्षी कापसावर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला, तसेच अतिवृष्टीमुळे जमीन चीभडून पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पिक उत्पादन येण्याची शक्यता कमी झाली. शेती पिकली नाही तर कर्ज कसे भरावे याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे मागील काही दिवसापासून ते अस्वस्थ झाले होते दोन दिवसांपूर्वीच ते घरातून बाहेर निघून गेले होते.

त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. मात्र आज दुपारी त्यांचा मृतदेह त्यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला आहे. याप्रकरणी नागोराव रेंगे यांच्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके, पोलीस उपनिरीक्षक श्री कांबळे, जमादार भुजंग कोकरे, श्री. मिरासे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com