कोरोनाचे संकट : दिलपसंदच्या शेतात सोडल्या मेंढ्या !

file photo
file photo

सेलू  (जि.परभणी) : कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या ‘लाॅकडाउन’ चा फटका सर्व क्षेत्राला बसला. बाजारपेठ बंद झाल्याने फळ-भाजी उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून ग्राहक उपलब्ध होत नसल्याने तयार दिलपसंद फळाच्या शेतात चक्क मेंढ्या सोडून देण्याची वेळ आली आहे.

मौजे हातनुर (ता.सेलू, जि.परभणी) गावातील शेतकरी मोतीराम रोकडे यांनी आपल्या शेतात जवळपास तीन एकर दिलपसंद फळाची लागवड केली. मोठ्या आशेने या पिकाला लागणारा खर्चही केला. पिकही मोठ्या प्रमाणात बहरून आले. दिलपसंद बाजारात न्यायची वेळ आली की कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाचे संकट निर्माण झाले. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात व राज्यात शासनाने ‘लाॅकडाउन’ केल्याने बाजारपेठ बंद झाल्या. काढणीस आलेल्या दिलपसंदसाठी ग्राहच उपलब्ध होत नसल्याने मोठ्या आशेने सांभाळ केलेल्या तीन एकरावरील दिलपसंदच्या शेतात मेंढ्या सोडण्याची वेळ आली.



 दिलपसंदसाठी ग्राहच उपलब्ध नाही
मागील वर्षी थोड्याशा शेतात लागवड केलेल्या दिलपसंदच्या उत्पन्नातून चांगले पैसे मिळाले होते. त्यामुळे या वर्षी जवळपास तीन एकर शेतीत दिलपसंदची लागवड केली. परंतु कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी ठप्प झालेल्या बाजापेठेने मोठे अर्थिक अडचण निर्माण झाली आहे. दिलपसंदसाठी ग्राहच उपलब्ध होत नसल्याने मोठ्या आशेने सांभाळ केलेल्या तीन एकरावरील दिलपसंदच्या शेतात मेंढ्या सोडण्याची वेळ आली.
- मोतीराम रोकडे, हातनुर(ता.सेलू, जि.परभणी)

हेही वाचा ....
भारनियमनामुळे अडचणीत भर
जिंतूर (जि.परभणी) :
 येलदरी (ता.जिंतूर) येथे आठ दिवसांपासून रोज सकाळी दोन तास सक्तीचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे संचारबंदित सध्याच्या उन्हाची दाहकता सहन करत घरीच थांबलेल्या नागरिकांच्या अडचणीत जास्तीचीभर पडली आहे. वास्तविक संपूर्ण राज्यात विजेची मागणी घटलेली असतांना फक्त येलदरी येथेच भारनियमन केले जात आहे.

नागरिकांमधून संताप
 सध्या कोरोनामुळे देशात सर्वत्र लॉकडाउन केलेले असतांना घराबाहेर कुणीही पडू नये म्हणून दूरदर्शनवर रामायण, महाभारत या धार्मिक मालिकांसह  इतर मनोरंजनाचे कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, नेमक्या याच काळात येलदरी येथील ३३ के. व्ही. वीज केंद्रावर दाब वाढल्याचे कारण सांगून सक्तीचे भारनियमन केले जात आहे. विशेष म्हणजे याठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे, हे पाहण्यासाठी एकदाही वरिष्ठ अधिकारी आलेले नाहीत. कुठलेही लेखी आदेश नाहीत. केवळ मोबाईलवरील आदेशावरून वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे येथील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. याकडे तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष वेधून सक्तीचे भारनियमन रद्द करण्याची मागणी सावंगी म्हाळसाचे उपसरपंच प्रमोद चव्हाण, मदन चव्हाण, दत्ता नवले, गजानन चव्हाण, भागवत कापुरे, दीपक चव्हाण यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com