क्वारन्टाईनच्या भितीने लातूरकर लपवतायत माहिती, सर्वेक्षणात वास्तव आले समोर

Latur Updates
Latur Updates

लातूर ः कोरोना विषाणुचा प्रसार व प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहे. मुंबई पुण्या सारख्या शहरात याचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या दोन शहरात लातूरकरांची संख्या हजारोच्या घरात आहे. लॉकडाऊन होण्याच्या अगोदर हे सर्व लातूरकर परत आपल्या घरी आले आहेत. अशा लोकांचे सर्वेक्षण महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. पण आपण जर माहिती सांगितली तर आपल्याला चौदा दिवस क्वारन्टाईन केले जाईल याची भिती मनात बसली आहे. त्यामुळे लातूरकर खरी माहितीच सांगत नसल्याचे समोर आले आहे. या सर्वेत चार लाख 80 हजार नागरीकांचा सर्वे करण्यात आला असून त्यात फक्त दोन हजार 917 लोकच पुणे, मुंबईहून आल्याचे समोर आले. खऱी माहिती दडपण्याचा प्रयत्न लातूरकर करीत आहेत. हे धोकादायक ठरू शकते.

महापालिकेच्या वतीने सुमारे तीनशे आशा वर्कर, अंगणवाडी ताईच्या माध्यमातून शहरात गेल्या आठ नऊ दिवसापासून सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात सुमारे 95 हजार घरापर्यंत हे कर्मचारी गेले आहेत. त्यात चार लाख 80 हजार नागरीकांपर्यंत हे कर्मचारी पोहचले आहेत. प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधून पुणे, मुंबई किंवा परदेशातून कोणी आले का? याची माहिती गोळा केली जात आहे. परदेशातील नागरीकासोबतच पुणे, मुंबईहून आलेल्या नागरीकाविषयी सर्वांच्या मनात भिती आहे. त्यात आपण मुंबई, पुणेहून आल्याचे सांगितले तर आपल्याला चौदा दिवस क्वारन्टाईन केले जाईल अशी भिती त्यांच्यात आहे. त्यामुळे खऱी माहिती लपवून ठेवून घरात बसण्याचा प्रयत्न सुरु आहे. आतापर्यंत चार लाख 80 हजार पैकी फक्त दोन हजार 927 लोकच पुणे, मुंबईहून लातूरमध्ये आले असल्याची माहिती या सर्वेक्षणातून समोर आली आहे. वास्तविक पाहता वीस ते पंचेवीस हजारापेक्षा ही संख्या अधिक आहे. परदेशातून 41 व्यक्ती आल्याचेही समोर आले आहे. या सर्वेक्षणातून 921 जणांना संशयित रुग्ण म्हणूनही पुढे संदर्भित करण्यात आले आहे. या साथीच्या रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे.


महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. पण पुणे, मुंबईहून आलेले नागरीक माहिती लपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. पुणे, मुंबईमध्ये राहणाऱया लातूरकरांची संख्या मोठी आहे. अशा नागरीकांना आम्ही चौदा दिवस क्वारन्टाईन करणार नाही. त्यांनी घरातच रहायचे आहे. पण लक्षणे असल्यास तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. लातूरकरांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
विक्रांत गोजमगुंडे, महापौर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com