धनगर आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात

धनगर आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात

औरंगाबाद - धनगर एसटी आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण आपल्या हक्‍काचे व विकासाचे प्रतीक आहे. हे आरक्षण न्यायालयीन लढ्याने मिळणारच असल्याचा ठाम विश्‍वास माजी पोलिस आयुक्त मधू शिंदे यांनी व्यक्त केले. 

अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंचतर्फे रविवारी (ता. 17) रामचंद्र हॉल, बीड बायपास रोड येथे "धनगर आरक्षण चिंतन परिषद' आयोजित करण्यात आली होती. या वेळी धनगर आरक्षण याचिकाकर्ते एम. ए. पाचपोळ, डॉ. जे. पी. बघेल, डॉ. सुभाष माने, बी. एन. कंदरफळे, नामदेवराव जाधव, पांडुरंग धायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी धनगर आरक्षण न्यायालयीन लढ्यासाठी संपूर्ण देशभर फिरून जमा केलेले पुरावे व त्याचे पॉवर प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण मधू शिंदे यांनी केले. आरक्षण म्हणजे काय, आरक्षण हक्कासंदर्भातील लढाई कशी आहे, यातील संभ्रम आणि न्यायालयीन लढाईची स्थिती यावर त्यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेला शहरातील नागरिक उपस्थित होते. सुरवातीला सुभाष बोंद्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दिनकर मस्के यांनी सूत्रसंचालन केले. अशोक शेळके यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com