...आणि विहिरच पेटली 

vihir
vihir

औरंगाबाद : विहिरीने पेट घेतला, यावर कोणाचा विश्‍वास बसणार नाही. मात्र सोमवारी (ता. 29) सकाळी संजयनगर येथील गणपती विसर्जन विहिरीने पेट घेतल्याचा प्रकार घडला. या विहिरीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला आहे. विहिरीतील कचऱ्याने पेट घेतला व भडका उडाला. परिसरात आगीचा धुराचे लोट पसरताच अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले व अग्निशमन विभागाने तासाभरात ही आग आटोक्‍यात आणली. 

शहरातील कचराकोंडी वर्षे उलटले मात्र अद्याप महापालिकेचे प्रक्रिया प्रकल्प सुरू झाले नाहीत. नागरिकही मोकळ्या जागेवर कचरा टाकत आहेत. गेल्या वर्षभरापासून औरंगपुरा, संजयनगरसह इतर गणेश विसर्जन विहिरीतही कचरा टाकला जात आहे. संजयनगर येथील विसर्जन विहिरीत मागील अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांकडून कचरा टाकत आहेत. त्याकडे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे दुर्लक्ष सुरू आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता या विहिरीतील कचऱ्याने अचानक पेट घेतला. क्षणार्धात आग भडकली व परिसरात धुराचे लोट पसरले. विहिरीतून धूर निघत असल्याने नागरिक आचंबित झाले.

अखेर कचऱ्याला आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाचे पथकप्रमुख शरद घाटेशाही यांनी घटनास्थळी धाव घेतली. तासाभरात ही आग विझविण्यात त्यांना यश आले. पथकातील ए. पी. नागरे, वैभव आहेरकर, किरण शेलार, विशाल निंबाळकर, वाहनचालक एम. के. धाडे यांच्या पथकाने एका तासात ही आग विझवत नागरिकांना यापुढे विहिरीत कचरा टाकू नका, अशी सूचना केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com