भाजपची घोषणा म्हणजे बळीराजाला गाजर: उद्धव ठाकरे

भाजपची घोषणा म्हणजे बळीराजाला गाजर: उद्धव ठाकरे

बीड : केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक नुसतेच दौऱ्यावर येऊन गेले, त्याचा काही फायदा झाला नाही. भाजपकडून घोषणांच्या नावावर नुसते बळीराजाला गाजर देण्यात येत आहे. भाजप फक्त घोषणांचे जुमले बांधत आहे, अशी सडकून टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जिल्ह्यात आगमन झाले असून त्यांच्या हस्ते पासबूपालक शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून व्यथा जाणून घेतल्या. पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, सुधीर मोरे आदी नेते सोबत आहेत. 

उद्धव ठाकरे म्हणाले, ''पीकविमा योजनेत साईनाथ यांनी नुकताच दावा केला होता, की राफेलपेक्षा मोठा गैरव्यवहार यात झाला आहे. नुसत्याच घोषणा करण्यात येत आहेत. पीक फसल नाही, फसवी योजना नाही. तुम्ही शेतकऱ्यांचे विषय सोडवू शकला नाहीत. तर, राम मंदिराचा विषयही तसाच आहे. राम मंदिराबाबत पंतप्रधान म्हणतात न्यायालयाचा जो निर्णय होईल तो मान्य. त्यांनी जाहिरनाम्यात काय सांगितले होते. नुसत्या घोषणांचा जुमला सरकारकडून बांधण्यात येत आहे. आता घोषणांचा पाऊस बंद करा. ज्या घोषणा केल्या आहेत, त्याची अंमलबजावणी करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com