वडवणीत पाच एकर ऊस जळून खाक

Five acres of sugarcane burning in Vadnani
Five acres of sugarcane burning in Vadnani

वडवणी (जि. बीड) : एकीकडे शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना पुन्हा महावितरण यंत्रणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. शेतीला पाणी द्यायला वीज उपलब्ध होत नसली तरी महावितरणच्या ढिसाळ यंत्रणेमुळे शेतकऱ्यांची उभी पिकर जळून खाक होत आहेत. 

तालुक्यातील खळवट लिमगाव येथे वीज तारांचे घर्षण होऊन ऊस फड जळण्याच्या दोन घटना या आठवड्यात घडल्या आहेत. शेतकरी धनंजय माने यांच्या शेतातील पाच एकर ऊस जाळून खाक झाल्याची घटना बुधवारी (ता. सात) दुपारी बारा वाजता घडली.

वीज वितरणच्या दुर्लक्षामुळे एकाच गावातील ही दुसरी घटना आहे. लिमगाव शिवारातून वीज वितरणांचे खांब काही शेतकऱ्यांच्या जमिनीतून गेलेले आहेत. आठ दिवसांपूर्वी तीन शेतकऱ्यांचा तब्बल वीस एकर ऊस जाळून खाक झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज दुपारी बाराच्या सुमारास धनंजय माने यांच्या शेतातील विजेच्या खांबावरील तारेमध्ये घर्षण होऊन त्याच्या ठिणग्या पडून उसाला आग लागली. त्यामुळे या आगीत पाच एकर ऊस जाळून खाक झाला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com