गरज पडल्यास गावांमध्येही चारा छावणी - महादेव जानकर

हाडोंग्री (ता. भूम) - गोशाळेत शेतकऱ्यांशी संवाद साधताना महादेव जानकर. यावेळी बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, अमेय पाटील आदी.
हाडोंग्री (ता. भूम) - गोशाळेत शेतकऱ्यांशी संवाद साधताना महादेव जानकर. यावेळी बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, अमेय पाटील आदी.

भूम - राज्यात जूनपर्यंत पुरेल इतका चारा शिल्लक आहे. गरज पडल्यास या भागात अन्य ठिकाणांहून रेल्वेने चारा आणण्यात येईल, अशी माहिती दुग्धविकास, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिली. दरम्यान, तहसीलदार, ग्रामसेवक व तलाठ्यांनी पाहणी केल्यानंतर व चारा छावणी मागणी अहवाल आल्यास गाव पातळीवरही चारा छावणी सुरू केली जाणार असल्याचे मंत्री जानकर यांनी सांगितले.

श्री. जानकर यांनी सोमवारी (ता. २८) तालुक्‍यातील हाडोंग्री येथील भगवंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या गोशाळेला भेट दिली. बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, अमेय पाटील, डॉ. विजयकुमार सूळ, जैन संघटनेचे सुनीलकुमार डुंगुरवाल, बाळासाहेब काठवटे, राजभाऊ वनवे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

श्री. जानकर म्हणाले, की सध्या चारा उपलब्ध आहे. दुष्काळग्रस्त भागात रेल्वेने पाणी आणल्यानंतर आता आगामी काळात चाराटंचाई निर्माण झालीच तर उस्मानाबादसह राज्यातील दुष्काळी भागात जनावरांसाठी रेल्वेने चारा आणला जाणार असून, त्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. पालघर, कोल्हापूर, पुणे, रायगड व रत्नागिरी या भागांतून हा चारा रेल्वे बोगीतून आणला जाणार आहे. उस्मानाबाद, बुलडाणा, औरंगाबाद, बीड व जालना या पाच जिल्ह्यांत हा चारा आणला जाणार आहे. दुष्काळग्रस्त भागात चारा छावणी सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर देण्यात आले असून, प्रत्येक मंडळ स्तरावर चारा छावणी सुरू करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com