लग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या 

लग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या 

औरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश काशीनाथ आठवले (वय 40, रा. ब्रिजवाडी) असे आत्महत्या केलेल्या वधुपित्याचे नाव आहे. 

ता. 18 नोव्हेंबरला त्यांच्या मुलीचे लग्न होते. आठवले यांची साधारण परिस्थिती होती. ते मजुरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी रात्री घरी कोणी नसताना आठवले यांनी छताच्या अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब नातेवाइकांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती सिडको पोलिसांना दिली. 
दरम्यान, पोलिसांनी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्‍टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. आर्थिक अडचणीत असल्याने ते चिंताग्रस्त होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय नातेवाइक व्यक्त करत आहेत.

घरात लग्नाची एकीकडे लगबग सुरू होती, तर दुसरीकडे पित्यानेच आत्महत्या केल्याने आठवले कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com