कचऱ्याच्या डोंगराची आकाशाला गवसणी

औरंगाबाद - चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाशेजारी असलेला कचऱ्याचा डोंगर.
औरंगाबाद - चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाशेजारी असलेला कचऱ्याचा डोंगर.

औरंगाबाद - चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प अवघ्या काही दिवसांत सुरू होणार असला तरी दुसरीकडे चारही प्रक्रिया प्रकल्पांवर कचऱ्याचे डोंगर अक्षरशः आकाशाला गवसणी घालत आहेत. पावसाळा सुरू होताच कचरा भिजून त्यातून निघणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील शेतीला धोका असल्याची कैफियत बुधवारी (ता. पाच) परिसरातील शेतकऱ्यांनी मांडली. 

कचराकोंडीनंतर गेल्या १६ महिन्यांत महापालिकेला एकमेव चिकलठाणा येथील प्रक्रिया प्रकल्पाचे काम मार्गी लावता आले. असे असले तरी या प्रकल्पाशेजारीच सुमारे ४० ते ५० हजार टन कचऱ्याचा डोंगर साचला आहे. असेच डोंगर हर्सूल, पडेगाव व कांचनवाडी येथील प्रक्रिया प्रकल्पांजवळ तयार झाले आहेत.

पावसाळा तोंडावर आलेला असताना या कचऱ्यावर अद्याप प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे बुधवारी चिकलठाणा परिसरातील शेतकऱ्यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक व घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांना कचऱ्याचे डोंगर कधी हटणार, अशी विचारणा केली. आज थोडासा पाऊस पडला, तरी कचऱ्याला दुर्गंधी सुटली. उद्या मोठा पाऊस झाला तर कचऱ्याचे लिचेड शेतात येईल. त्यामुळे तातडीने मार्ग काढा, अशी मागणी त्यांनी केली. लिचेड शेतात जाणार नाही. त्याची काळजी घेऊ, असे आश्‍वासन देत भोंबे यांनी शेतकऱ्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. यावेळी संतोष रिठे, दिगंबर कावडे, अंकुश कावडे, संतोष गोटे, विजय जाधव यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com