बायपासवर पुन्हा कचराग्नी

औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर गुरुवारी कचरा पेटविण्यात आला. त्यामुळे सर्वत्र धूर पसरला होता.
औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर गुरुवारी कचरा पेटविण्यात आला. त्यामुळे सर्वत्र धूर पसरला होता.

औरंगाबाद - कचरा पुरणे, जाळून टाकण्याचे महापालिका प्रशासनाचे अघोरी प्रयोग सुरूच आहेत. काही वॉर्डांचा कचरा थेट बीड बायपासवर टाकून तो पेटवून दिला जात आहे. त्यामुळे वाहनधारकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

शहरातील कचराकोंडीला आठ महिने उलटले आहेत; मात्र अद्याप प्रशासनाला तोडगा काढता आलेला नाही. त्यात कचरा पुरून, जाळून जिरविण्याचे प्रकार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून बीड बायपास रोडवर कलर फॅक्‍टरीच्या पुढे कचऱ्याची वाहने रिकामी केली जात आहेत. हा कचरा नंतर पेटवून दिला जात आहे. त्यामुळे बायपासवरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारी (ता. १८) अशाच प्रकारे कचरा पेटवून देण्यात आल्याने बायपासवर धुराचे लोट दिसून येत होते. 

नागरिक मित्राची उरली नाही भीती 
कचरा रस्त्यावर फेकणारे, कॅरिबॅग वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने नागरिक मित्र पथकाची स्थापना केली आहे. माजी सैनिक दिवसभर शहरात फिरून कारवाया करत आहेत. या पथकानेदेखील महापालिकेचे कर्मचारीच कचरा पेटवून देत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com