गेले होते जाब विचारण्यासाठी अन् केली तोडफोड...

todfod
todfod

हिंगोली ः शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, ‘कृषी विभागाचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय’ अशा घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयात येऊन मंगळवारी (ता.२३) खुर्च्यांची तोडफोड करून चालू असलेली बैठक उधळून लावली.

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात मंगळवारी तीनच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकीने यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कार्यालयावर पाच ते सहा कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील सेनगाव, हिंगोली, वसमत, कळमनुरी तालुक्यात महाबीज मंडळाचे अंकुर कंपनी आदींच्या निकृष्ट बियाणांची पेरणी केली असता मात्र हे बियाणे उगवले नसल्याची विचारणा कृषी अधिकारी विजय लोखंडे यांच्याशी केली. संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे  दिल्याने कृषी विभागात सुरू असलेल्या बैठकीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घुसून घोषणाबाजी करीत खुर्च्यांची तोडफोड करीत बैठक उधळून लावल्याने हा गोंधळ तासभर सुरु होता.

आधीच शेतकरी त्रस्त त्यात फसवणूक  
जिल्ह्यात काही ठिकाणी महाबीज व इतर बियाणांची पेरणी केली असता काही ठिकाणी अत्यल्प प्रमाणात उगवले तर काही ठिकाणी उगवले नसल्याचे सांगून आधीच गेली तीन महिन्यापासून शेतकरी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाउन करण्यात आल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यातच पुन्हा मागील वर्षी उत्पादन घेतलेल्या सोयाबीन, कापूस, हळद पिकांना पुरेश्या प्रमाणात भाव मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत सापडला असताना आता यंदा खरीप हंगामात एन पेरणीच्या काळात बियाणे कंपनीकडून बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.

बैठक उधळून लावत घोषणाबाजी
याबाबत संघटनेने कंपन्यांवर काय कारवाई करता, असा जाब विचारला असता अधिकारी निरुत्तर झाले. या वेळी महाबीज, अंकुर निकृष्ट बियाणे कंपनीचा निषेध व्यक्त केला. या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक उधळून लावत घोषणाबाजी सुरु केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, शेतकरी संघटनेचा विजय असो, असे म्हणत सुरु असलेल्या बैठकीत गोंधळ घातला. या वेळी नामदेव पतंगे, सुभाषराव गाडगे, बापूराव गरड, पराग अडकीने, नारायण कदम ,गोपीनाथ बहादूरे, ऋषिकेश बर्वे आदींनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात गोंधळ घालत खुर्च्यांची तोडफोड केली.

कारवाईचे आश्‍वासन मिळाले अन् कार्यकर्ते निघाले 
या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी शांत राहण्याच्या सूचना दिल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संबंधित निकृष्ट बियाणे कंपनीवर पंचनामे करून कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यापूर्वी देखील एनटीसी येथील पीक विमा कार्यालयात घुसून तोडफोड केली होती, आता ही दुसरी घटना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com