हिंगोली : जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणारे कोरोनाबाधित ४५ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना बुधवारी (ता. तीन) रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता केवळ ३२ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली.
जिल्हाभरात आतापर्यंत १८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी यापूर्वी १०५ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बुधवारी यात ४५ भर पडली असून कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
हेही वाचा - हिंगोलीत भुईमुगाच्या चार हजार पोत्यांची आवक
जिल्ह्यात ३२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार
यात हिंगोली केअर सेंटरमधून २९, जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात उपचार घेणाऱ्या चार, सेनगाव येथील कोरोना केअर सेंटरमधील १२, अशा एकूण ४५ रुग्णांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात ३२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून २११ संशयितांचा अहवाल येणे प्रलंबित आहे.
जिल्ह्यातंर्गत कोरोनाबाधित रुग्ण
कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये आठ रुग्ण उपचार घेत आहेत. यात घोडा कामठा एक, कांडली एक, चाफनाथ तीन, आडा एक, येडशीतांडा दोन रुग्णांचा समावेश आहे. वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण १२ रुग्ण असून यात हट्टा चार, गिरगाव दोन, अकोली एक, कुरुंदवाडी एक, हयातनगर दोन, कौठा एक, वसमत शहर एक रुग्णांचा समावेश आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थीर असून कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत.
आयसोलेशन वार्डात १२ रुग्ण
जिल्हा सामान्य रुग्णातील आयसोलेशन वार्डात १२ रुग्ण उपचार घेत असून यात सुरेगाव तीन, नागेशवाडी एक, सामुदाय आरोग्य अधिकारी एक, पहेणी दोन, माझोड एक, चोंढी खुर्द एक, बाराशीव दोन, रिसाला बाजार एक रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांनाही कोणत्याही प्रकारचे गंभीर लक्षणे नाहीत. त्यांच्यावर तज्ज्ञ वैद्यकीय पथकामार्फत औषधोपाचार करण्यात येत आहेत.
येथे क्लिक करा - हिंगोलीत नऊ हजार मजुरांच्या हाताला काम
१५१ रुग्ण ठणठणीत
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १८३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १५१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्य:स्थितीत ३२ रुग्णबाधित असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार सुरु असुन सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. श्रीबास यांनी सांगितले.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये
नागरिकांनी सतर्क राहून कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरी थांबून आपले आणि आपल्या कुटुंबीयाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.