राज्य शासन खासगी संस्थांवर मेहरबान

education
education

लातूर : वैद्यकीय, अभियांत्रिकीसह विविध अभ्यासक्रमासाठी `सेतू अस्टीटंट ऍडमिशन रजिस्टर` (सार) या पोर्टलवरून प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. या करीता शासनाने ठिकठिकाणी सेतू केंद्र सुरु केले आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर कागदपत्राची पडताळणी या केंद्रावर केली जाणार आहे. असे सेतू केंद्र देताना शासनाने शासकीय महाविद्यालयांना वाऱयावर सोडून खासगी संस्थावर मेहरबानी दाखवली आहे. एकाही शासकीय महाविद्यालयात सेतू केंद्र देण्यात आलेले नाही. प्रवेश प्रक्रिया सुरु होवून सात दिवस झाले तरी या सेतू केंद्राना प्रशिक्षणच देण्यात आलेले नाही.

कागदपत्रांची यादी पाहूनच परेशानी
`सार`च्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरु केल्यानंतर ४८ कागदपत्राची यादी येत आहे. हे सर्व कागदपत्र दाखल करायची आहेत. ही कागदपत्र गोळा करताना विद्यार्थ्यांचे नाकेनऊ येत आहे. काही कागदपत्र गरजेचे नसताना दाखल करावी लागत आहेत. यात सुटसुटीतपणा आवश्यक आहे. तसेच ही कागदपत्राची इमेज अपलोड करणे सोपे जाते पण  `पीडीएफ` फाईल बंधनकारक केल्याने वेळखाऊपणाची ठरत आहे.

प्रशिक्षण विना असलेले `सेतू` केद्र
या प्रवेश प्रक्रियेत शासनाने खासगी संस्थांची सेतू केंद्र म्हणून नियुक्ती केली आहे. या केंद्रावर प्रवेश प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन व कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहे.  पण प्रवेश प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन कसे करायचे, कागदपत्राची पडताळणी कशी करायची याचे प्रशिक्षण मात्र दिलेले गेलेले नाही.  त्यामुळे पालक विद्यार्थी या केंद्रावर जावून खाली हात परत येत आहेत.

प्रवेश वैद्यकीयला अन `सेतू` अभियांत्रिकीला
वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा इतर अभ्यासक्रमाचा प्रवेश असो त्या त्या संबंधीत महाविद्यालयात सेतू केंद्र राहणे अपेक्षित होते. पण इथे मात्र शासनाने अजब कारभार केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयात सेतू केंद्रच दिले गेलेले नाही. अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयात सेतू केंद्र दिले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना देखील वाऱय़ावर सोडले आहे. खासगी संस्थांनाच सेतू केंद्र दिले आहे. येथील कर्मचारी वैद्यकीय किंवा इतर अभ्यासक्रम किंवा त्याच्या महाविद्यालयाचे कसे मार्गदर्शन करणार हा प्रश्नच आहे.

हजारो विद्यार्थ्यांसाठी `सेतू` चारच
या प्रवेश प्रक्रियेत शासनाने सेतू केंद्र बोटावर मोजण्या इतकेच दिले आहेत. लातूर जिल्ह्यात वीस ते २५ हजारावर विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. यात सेतू केंद्र मात्र चारच देण्यात आले आहेत. अशीच परिस्थिती इतर जिल्ह्यांची आहे. या केंद्राच्या वतीने विद्यार्थ्याना कागदपत्र पडताळणीसाठी तारखा दिल्या जाणार आहेत. या केंद्रांनी रोज दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांचे कागदपत्र पडताळणी केले तर सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायलयाच २५ दिवस लागण्याची शक्यता आहे. सेतू केंद्राची संख्या वाढवून शासकीय महाविद्यालयांनाही सेतू केंद्र देवून प्रक्रिया लवकरच करण्याची गरज आहे.

शासनाने ५२ अभ्यासक्रम एकाच पोर्टलखाली आणले आहेत. सुक्षिशीत पालक देखील संभ्रमावस्थेत आहेत. या प्रक्रियेचा विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येत आहे. सेतू केंद्रानाही प्रक्रियेची माहिती नाही. त्यामुळे गोंधळाची स्थिती आहे. शासनाने ही प्रक्रिया सुटसुटीत करावी. शासकीय महाविद्यालयात सेतू केंद्राची संख्या वाढवावी. अन्यथा ही प्रक्रियाच बरेच दिवस चालेल. महाविद्यालये उशिरा सुरु होतील.
- मनोहर पाटील, पालक, लातूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com