दिल्लीतील घटनेला सरकार जबाबदार, जेएनयूच्या विद्यार्थ्याचा आरोप

दिल्लीतील घटनेला सरकार जबाबदार, जेएनयूच्या विद्यार्थ्याचा आरोप

लातूर : हिंदू किंवा मुस्लिम लोक दंगा घडवून आणत नाहीत. हे काम गर्दीत घुसलेले काही प्रायोजित लोकच करतात. पण, दंग्यातून आजवर सामान्य माणसाचेच नुकसान झाले आहे. त्यामुळे दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमागे नेमके मागे कोण आहे, हे शोधायला हवे. मात्र, या घटनेची जबाबदारी सरकारने स्वीकारायला हवी. त्यांना आपण खूर्चीवर बसवले आहे. लोकांना संरक्षण पुरविणे त्यांचे काम आहे. त्यांनी ते केले नाही, असा आरोप दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी शशिभूषण पांडे यांनी बुधवारी (ता.२६) येथे केला.


मुव्हमेंट अगेंस्ट सीएए, एनआरसी, एनपीआर यांच्या वतीने अण्णा भाऊ साठे चौकात मुस्लिम बांधवांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या १३ व्या दिवशी पांडे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. हादसों के शहर में, एक हादसा एैसा हुआ... अशी वेगवेगळी गाणी सादर आणि अरे हम क्या चाहते... आझादी अशा वेगवेगळ्या घोषणाही त्यांनी दिल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


श्री. पांडे म्हणाले, ‘‘देशात काय होत आहे आणि काय होऊ शकते, हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. पुढे गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आत्ताच सावध, सजग राहायला हवे. संविधानाची नुसती पूजा करू नका. संविधान समजून घ्या. संविधानाने आपल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान करायचे, हे आपल्याला कळले आहे. पण, ते नेमके कुठे करायचे, हे आपण समजून घेतलेच नाही. सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याच्या विरोधात देशभरात सुरू असलेली आंदोलने ही कोण्या एकासाठी नाहीत. समाज एकसंध राहावा, यासाठी आहेत.’’ विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मारहाण, नागरिकांना मारहाण या प्रकरणांत दिल्ली पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, असेही ते या वेळी म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com