औरंगाबाद : "लाखोंच्या संख्येत संयमाने मोर्चे काढूनही सरकार मराठा समाजाचे समाधान करु शकले नाही. सरकारच्या वेळकाढू धोरणाने आंदोलन चिघळले. या परिस्थितीत केवळ शांतता पाळण्याचे आवाहन करण्याऐवजी सकारात्मक पाऊल उचलून कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा.'' असे माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात दहा दिवसांपासून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर श्री. देशमुख यांच्या निवासस्थानी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या मार्गदर्शक समन्वयकांची मंगळवारी (ता. 31) सायंकाळी बैठक झाली. यावेळी लवकर राज्यव्यापी बैठक घेण्याचेही ठरले आहे. बैठकीला मानसिंग पवार, प्राचार्य प्रताप बोराडे, विवेक भोसले, बी. एस. खोसे, सुभाष शेळके, प्रमोद खैरनार, प्रदीप पाटील, साकेत भांड, प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, गंगाधर औताडे, जयराज पाथ्रीकर, रमेश गायकवाड यांची उपस्थिती होती.
समन्वयकांच्या चर्चेतील मुद्दे...
आरक्षणाची मर्यादा वाढू शकते :
आरक्षणाबाबत 50 टक्केची मर्यादा ही राज्यघटनेची नाही. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे. सरकार योग्यपद्धतीने मागणी करावी. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयही आपल्या निर्णयात बदल करु शकते. आरक्षण वाढवून मागणे ही घटनाबाह्य गोष्ट नाही. असेही निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांनी स्पष्ट केले.
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.