औरंगाबादमध्ये कचरा संकलनावर लवकरच जीपीएस

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - वर्गीकरणाऐवजी संमिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या केंद्रांवर नेऊन टाकला जात आहे. त्यामुळे आता महापालिका व कंपनीच्या 221 रिक्षा, सहा हायवा या वाहनांवर वॉच ठेवण्यासाठी महापालिकेने 'जीपीएस'ची मॉनिटरिंग सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व वाहनांच्या जीपीएसची मॉनिटरिंग सिस्टीम पालिका मुख्यालयात उभारली जाणार आहे.

15 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होणार असून, कामाला सुरवात केली जाणार असल्याची माहिती घनकचरा प्रकल्पप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सोमवारी (ता. 29) महापौर नंदकुमार घोडेले यांना आढावा बैठकीत दिली. डोअर टू डोअर कचरा संकलन व वाहतुकीच्या कामाचे खासगीकरण महापालिकेने केले. मात्र, कंपनीकडून कराराप्रमाणे काम केले जात नसल्याचा कांगावा आता पालिका प्रशासनानेच सुरू केला आहे. कामगारांचे वेतन कंपनीकडून थकविले जात असल्याने वारंवार आंदोलन केले जात आहे. कामगार नित्याने कामावर येत नसल्याने कचरा संकलनात अडचणी निर्माण होत आहेत. शहरात चार-चार दिवस जागोजागी कचऱ्याचे ढीग पडून राहत असल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

कचऱ्याच्या भावात नाल्यावरचा गाळ 
महापालिकेने केलेल्या नालेसफाईतील गाळ पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीने उचलला आहे. आतापर्यंत शेकडो टन गाळ उचलून कंपनीने शहराबाहेर नेऊन टाकला. याचे बिल मात्र कंपनीला कचऱ्याच्या भावात प्रतिटन 1,662 रुपयांप्रमाणे देण्याची मागणी कंत्राटदाराने केली आहे. गाळाचे वजन अधिक असल्याने ते महापालिकेला परवडणारे नाही. त्याऐवजी केवळ वाहतुकीचा खर्च देण्याचे आदेश महापौरांनी बैठकीत दिले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com