बेवारस वाहनांना ‘ब्रेक’

Vehicle
Vehicle

औरंगाबाद - शहरातील मुख्य रस्त्यांवर वर्षानुवर्षे धूळखात पडून असलेल्या भंगार वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. अनेक वेळा शेजारी राहणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासंदर्भात धोरण ठरविण्याचे आदेश नगरविकास विभागाने महापालिकांना दिले आहेत.

शहरातील रस्त्यांवर पडून असलेली बेवारस वाहने मोठी डोकेदुखी ठरत आहेत. विशेषतः गॅरेजसमोर मोठ्या प्रमाणात वाहने पडून असतात. त्यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होते, वाहनांच्या परिसरात झाडे-झुडपे वाढतात. त्यामुळे महापालिकेने वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने काही वर्षांपूर्वी अशी बेवारस वाहने उचलून मोकळ्या जागेत जमा केली होती; मात्र पुन्हा शहरात बेवारस वाहनांची संख्या वाढली आहे. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा दाखला देत नगरविकास विभागाने महापालिकांना आदेश दिले आहेत.

महापालिकांनी बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याची कारवाई करण्यासाठी पोलिसांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, नागरिकांना तक्रारी करण्यासाठी तक्रार निवारण केंद्र व टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून द्यावा, ई-मेल, व्हॉट्‌सॲप क्रमांक उपलब्ध करून द्यावा, निश्‍चित केलेल्या धोरणानुसार कारवाई करण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तक्रारींचा आढावा 
नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर त्याची नोंदवही तयार करण्यात यावी, संबंधितांना तक्रार क्रमांक देण्यात यावा. एवढेच नव्हे; तर निनावी तक्रारीदेखील घेण्यात याव्यात असे शासनाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. उपायुक्तांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडूनच आढावा घेण्यात यावा, असे बंधनही घालण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com