हिंगोली : बुलडाणा जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. शिवाय खोटे गुन्हे नोंद केले. ते मागे घ्यावे, अशी मागणी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मंगळवारी (ता. १४) जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली. शिवाय या घटनेचा निषेधही केला.
निवेदनाचा आशय असा ः बळाचा वापर करून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यात आले. शेतकऱ्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने गंभीर स्वरूपाच्या कलमान्वये शेतकऱ्यांवर गुन्हे नोंद करून त्यांना अटक करण्यात आली, असा आरोप निवेदनात करण्यात आला. शिवाय हे गुन्हे रद्द करावे, अशी मागणीही करण्यात आली.
निवेदनावर पक्षाचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे, संघटक उद्धव गायकवाड, उपजिल्हा प्रमुख परमेश्वर मांडगे, लोकसभा संघटक डॉ. रमेश शिंदे, तालुका प्रमुख भानुदास जाधव, आनंदराव जगताप यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.