औरंगाबाद : राज्य शासनातर्फे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातंर्गत देण्यात येणारा 2016-17 चा 'तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम' या राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराचा मान (25 लाख रुपये) हिवरेबाजार (ता. जि. नगर) ग्रामपंचायतीला येथील जगदगुरु संत तुकाराम महाराज नाट्यगृहात शनीवारी (ता. 8) प्रदान करण्यात आला. व्दितीय विभागून (प्रत्येकी 10 लाख रुपये) मन्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा) व शेळगाव गौरी (ता. शेळगाव, ता. नायगाव, जि. नांदेड) तिसरा विभागून (प्रत्येकी साडेसात लाख रुपये) धाटाव (ता. रोहा, जि. रायगड) व राजगड (ता. मुल, जि. चंद्रपुर) देण्यात आला.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आला. औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी गावात स्वच्छता व आरोग्य विषयक जनजागृती केल्याबद्दल महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांचा लोणीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अहमदनगर ग्रामसेवक सोशल फाऊंडेशनतर्फे करण्यात आलेला पाणंदमुक्ती विषयीचा लघूपट यावेळी दाखवण्यात आली, विशेष म्हणजे या लघूपटात सर्व ग्रामसेवकांनीच भुमिका केल्या आहेत.
आजवर 4 हजार 472 कोटी खर्चून राज्यात 60 लाख स्वच्छताग्रह बाधले. काहींचे अनुदान राहिले असेल पण त्यासाठी नुकतेच केंद्राकडून 1352 कोटी राज्याला अनुदान मिळाले आहेत आणि सर्व जिल्हा परिषदांना वितरीत करण्यात आले आहे.
-बबनराव लोणीकर, स्वच्छता मंत्री
बेसलाईन सर्वेच्या बाहेर राहिलेत त्या 10 लाख कुटूंबाना वयक्तिक स्वच्छताग्रह बांधून दिले जातील. यासाठी प्रत्येकी 12 हजार अनुदान दिले जाईल याला केंद्राने मंजुरी दिल्याचे सांगितले.
-शामलाल गोयल, अतिरिक्त सचिव पाणी पुरवठा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.