खासदार इम्तियाज यांनी मांडली विमानसेवेची व्यथा लोकसभेत 

खासदार इम्तियाज यांनी मांडली विमानसेवेची व्यथा लोकसभेत 

औरंगाबाद -  औरंगाबाद जिल्ह्यात जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी आहेत; मात्र विमानसेवा नसल्याने पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे इंडियन एअरलाइन्सच्या मदतीने तातडीने विमानसेवा सुरू करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत केली. 

पर्यटनासाठी पुरेशा सोयी नसल्याने शहरातील हॉटेल ओस पडली आहेत. जगभरातील पर्यटकांना या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची इच्छा असली, तरी विमान वाहतूकसेवा विस्कळित झाल्यामुळे ते येऊ शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संसदेतील भाषणात पर्यटनाला चालना देणार असल्याचे सांगितले आहे. याची सुरवात औरंगाबादमध्ये मुंबई, दिल्लीसाठी विमानसेवा सुरू करून करावी, अशी मागणीही इम्तियाज यांनी सभागृहात केली. जेट एअरवेजची सेवा देशभरात बंद झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादला बसला आहे. औरंगाबादहून दिल्ली आणि मुंबईला जाणारी दोन विमाने रद्द झाल्यामुळे जगभरातून येणाऱ्या पर्यटक; तसेच उद्योजकांची मोठी गैरसोय होत आहे. त्याचा परिणाम पर्यटन व उद्योग व्यवसायवर होत असल्याचे सांगत खासदार इम्तियाज यांनी या प्रश्‍नावर सभागृहाचे लक्ष वेधले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com