औरंगाबाद - रघुवीरनगर येथील उद्योजक कुटुंबावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. हल्लेखोराने चोरीसाठी नव्हे; तर अंतर्गत वादातून हल्ला केल्याचे समोर येत आहे. उद्योजकाच्या बंगल्यात असलेले दहा सीसीटीव्ही कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद आहेत. दरम्यान, अन्य ठिकाणच्या सीसीटीव्हीत जॅकेट परिधान केलेला हल्लेखोर पळताना कैद झाला आहे. हल्लेखोर निष्पन्न झाला असून, त्याला ताब्यात घेण्याची शक्यता वाढली आहे.
रघुवीरनगर येथील उद्योजक पारस छाजेड (वय 72), त्यांच्या पत्नी शशिकला (वय 65), नातू पार्थ (वय 17) यांच्यावर बुधवारी रात्री अकराच्या सुमारास बंगल्यात कोयत्याने हल्ला झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाळीस वर्षांपासून श्री. छाजेड यांची चिकलठाणा एमआयडीसीत वीजपंपाची कंपनी आहे. तेच कंपनीचा कारभार पाहतात. त्यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. मुलगा आशिष ऐन हल्ल्यावेळी बाहेर होता. त्यामुळे जवळच्या व ओळखीतील व्यक्तींवर पोलिसांना संशय आहे. हल्ला आर्थिक, व्यावसायिक वादातून घडल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
कोण काय म्हणाले...
आजीनाथ बडक (शेजारी) - मी कंपनीतून आलो. नंतर जेवण करून झोपी गेलो. हल्लेखोर हल्ला करून गेल्यानंतर आरडाओरड समजल्यानंतर मी बाहेर आलो. त्यावेळी कुटुंबातील भाभी वरच्या मजल्यावर गॅलरीत होत्या. त्यांना घरासमोर बांधकाम सुरू असलेल्या जागेवरून शिडी आणून खाली उतरवले. आधी काय घडले, याची कल्पनाच नाही.
आशिष छाजेड - आमचा कुणासोबतच वाद नव्हता. कोणीही आमच्यावर नाराज नाहीत. कुणासोबत शत्रुत्व नव्हते.
विधी छाजेड - हल्ला झाल्यानंतर मी घडलेला प्रकार पतीला संपर्क साधला; पण त्यांचा संपर्क होत नसल्याने मित्राच्या मोबाईलवरून त्यांना कळविले.
पोलिस सूत्र - ज्यावेळी आशिष छाजेड घरी आले तेव्हा जखमींना रुग्णालयात नेण्याच्या हालचाली सुरू होत्या. तेव्हा एक मिनीट थांबा, मी शूटिंग घेतो, असे आशिष म्हणाल्याची बाब पोलिस सूत्रांनी दिली.
घटनाक्रम
असा झाला हल्ला...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.