Corona Breaking : जालन्यात आजपासून कोरोना टेस्टला सुरुवात, तर ६८ जण पॉझिटिव्ह 

corona.jpg
corona.jpg

जालना :  शहरात कोरोनाचा प्रकोप सुरूच असून शुक्रवारी (ता.१७) ६८ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्हात एकूण कोरोना बाधितांची संख्या ही साडे बाराशेपर्यंत जाऊन पोहचली आहे. 

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांपैकी सर्वाधिक रूग्ण हे जालना शहरातील आहेत. त्यामुळे जालना शहराला कोरोनाचा वेढा पडल्याचे चित्र आहे. कोरोनाचा हा वेढा दुर करण्यासाठी शहरात मागील बारा दिवसांपासून लॉकडाउन सुरू आहे. या लॉकडाउन दरम्यान भाजीपाल्यासह किराणा दुकाने ही बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, तरी देखील कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. शुक्रवारी (ता.१७) ६८ जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
  
दरम्यान जालना जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल एक हजार २५० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत ७२७ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्यपरिस्थीतीमध्ये जालना कोव्हीड-१९ रूग्णालय येथे ४३७ जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच ३५ जणांना उपचारासाठी इतर ठिकाणी रेफर करण्यात आले आहेत. तर आतापर्यंत ५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


जालन्यात कोरोना टेस्टला सुरवात, आज तीनशे नमून्यांची 
जालना कोव्हीड-१९ रूग्णालय परिसरात उभारण्यात आलेल्या आरपीटीसीआर लॅबमध्ये कोरोनाचा चाचणीचा शुक्रवारपासून (ता.१७) प्रारंभ होणार आहे. शुक्रवारी (ता.१७) सुमारे तीनशे ते साडेतीनशे कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी 'सकाळ'शी बोलतांना दिली आहे. 
दरम्यान जालना येथील कोरोनाचा चाचणीसाठी औरंगाबाद येथे नमूने पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून प्रलंबित अहवालाची संख्येत भर पडत चालली आहे. जालना येथील आरपीटीसीआर लॅबमध्ये टेस्टिंग सुरू झाल्याने प्रलंबित अहवालाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

जालना कोव्हीड-१९ रूग्णालय येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरपीटीसीआर लॅब मंजूर करून घेतली. त्यानंतर युद्ध पातळीवर या प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. मागील पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थिती होती. 
त्यानंतर या प्रयोगशाळेत प्रथामिक तत्वावर कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. त्यामुळे जालना जिल्ह्यातील कोरोना चाचणीसाठीचे स्वॅब हे औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. मात्र, मागील तीन दिवसांपासून शकडो अहवाल प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला कोरोना अहवालांची प्रतिक्षा करण्याची वेळ येत आहे. 

दरम्यान जालना येथील आरपीटीसीआर लॅबचा लॉगिंग आयडी गुरूवारी (ता.१६) रात्री प्राप्त झाला आहे.  त्यामुळे शुक्रवारपासून (ता.१७) जालना आरपीटीसीआर लॅब येथे टप्या-टप्याने कोरोना चाचण्या करण्यास सुरवात केली जाणार आहे. शुक्रवारी (ता.१७) तीनशे ते साडेतीनशे कोरोनाचा चाचण्या करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाचा चाचणीच्या अहवालासाठी लागणार वेळ वाचणार आहे. दरम्यान जालना येथील आरपीटीसीआर लॅब पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास अजून  तीन ते चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या प्रयोगशाळाते पूर्ण क्षमतेने कोरोना चाचण्या सुरू झाल्यानंतर औरंगाबाद वाऱ्या बंद होणार आहे. 

(संपादन : प्रताप अवचार)


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com