अमरावतीचे पथक करणार "जलयुक्त'ची तपासणी

Jalyukta Shivar
Jalyukta Shivar
हिंगोली - जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या गावांची तपासणी करण्यासाठी अमरावती विभागाचे पथक लवकरच औरंगाबाद विभागात दाखल होणार आहे. हे पथक विभागातील आठ गावांतील कामांची तपासणी करणार आहे. जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत मराठवाड्यात विविध गावांमधून सिमेंट नालाबंधारे, नाला खोलीकरण, रिचार्ज शाफ्ट, तलावातील गाळ काढणे यांसह इतर जलसंधारणाची कामे केली जात आहेत. 2016-17 या वर्षात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधून कोट्यवधींची कामे झाली असून, त्यातून पाणीसाठा वाढला आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावांचे मूल्यमापन करून एका गावाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वारेगाव, जालना जिल्ह्यातील लिंगस, बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना, लातूर जिल्ह्यात दावतपूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील मंगरूळ, परभणी जिल्ह्यातील मरडसगाव, हिंगोली जिल्ह्यातील बाभूळगाव आदी गावांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com