जायकवाडीने गाठला तळ

जायकवाडी - नाथसागर जलाशयातील पूर्वीचा औरंगाबाद-पैठण रस्ता उघडा पडला आहे.
जायकवाडी - नाथसागर जलाशयातील पूर्वीचा औरंगाबाद-पैठण रस्ता उघडा पडला आहे.

जायकवाडी - सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण तालुक्‍यातील जायकवाडी (नाथसागर) धरणाने पाण्याचा तळ गाठला आहे. त्यामुळे जलाशयातील पूर्वीचा औरंगाबाद - पैठण हा रस्ता पूर्णपणे उघडा पडला आहे. 

या जलाशयातून औरंगाबाद, जालना, पैठण, अंबड, नेवासा, शेवगाव आदी गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सद्यःस्थितीत असलेला पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे. या साठ्यातून वरील गावांची तहान भागविण्यात येत असून, पाणी आरक्षित असल्यामुळे औद्योगिक वसाहतीस पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची परिस्थिती लक्षात घेता यापुढे काही प्रमाणात पाणीकपात केली जाण्याची शक्‍यता आहे. सध्या जलाशयात -०७.४९ टक्के पाणीसाठा आहे.

त्यामुळे पाणी जपून वापरणे गरजेचे झाले आहे. शुक्रवारी (ता. सात) धरण परिसरात एक मि.मी. एवढा पाऊस झाल्याची माहिती धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी दिली.

सध्या जलाशयातील पाणी लांब गेल्याने तेथील पूर्वीच्या रस्त्यांसह इतर जुन्या वास्तू उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. याबरोबरच शंख, शिंपल्यांचा पडलेला खच मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com