जायकवाडी धरणात बुडालेली गावे दुष्काळात पडली उघडी

पैठण - धरणाच्या पात्रातील उघड्या पडलेल्या मंदिराचे भग्नावशेष. ( दुसऱ्या छायाचित्रात) दर्गा.
पैठण - धरणाच्या पात्रातील उघड्या पडलेल्या मंदिराचे भग्नावशेष. ( दुसऱ्या छायाचित्रात) दर्गा.

पैठण - यंदाच्या भीषण दुष्काळात पाण्याअभावी आटत चाललेल्या जायकवाडी धरणात बुडालेली गावे उघडी पडली आहेत. यातून गावाचा इतिहास ताजा होत असून, आठवणींना उजाळा मिळत आहे. पुनर्वसन झालेल्या धरणग्रस्तांच्या मनात आजही भावुकतेचा भाव प्रकट होत आहे. ‘त्या तळी हरवले गाव, आज दिसे त्याचा ठाव’ या उत्कट भावनेचा आविष्कार जाणवत आहे. 

पाण्याअभावी उघड्या पडलेल्या गावांचा चमकदार रंग उडून गेला आहे. या उघड्या पडलेल्या गावांतील घरे, वाडे, देऊळ, मंदिरे, दर्गा, विहिरी, आड, बारव, शेती शिवार आदी गाव समृद्धीची कितीतरी ठिकाणे मनाला स्पर्श करीत आहेत. त्या गावच्या तत्कालीन ग्रामस्थांचे व आजच्या धरणग्रस्तांचे मन हेलावून जात आहे. या आठवणीतून पुनर्वसनाची संवेदना व्यक्त होत आहे. 

अजूनही धरणग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन झाले नसल्याबद्दल खंत व्यक्त केली जात आहे. धरणात जी गावे गेली, त्यातील नारळा, गांगलवाडी ही दोन गावे पैठण शहरात, तर अन्य गावे पैठण तालुक्‍यासह नगर जिल्ह्यातील शेवगाव व नेवासा येथे स्थापित झाली. धरण निर्मितीचा सरकारी दप्तरातील काळ १९६० पासून सुरू झाला. 

यानंतर दोन वर्षांनी धरणासाठी संपादित झालेल्या गावांचे पुनर्वसन होऊन ही गावे स्थापित झाली. दरम्यान, धरण पात्रातील बुडीत गावे आता उघडी पडली आहेत, अशी माहिती धरण सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com