कळंबच्या दुय्यम निबंधक कार्यलयातील 'सर्व्हर डाउन', खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प

राज्यातील रजिष्ट्री कार्यलयाला नेटवर्क कनेक्टिव्हिटी देण्याचे काम राष्ट्रीय सूचना केंद्राकडे (एनाआयसी) देण्यात आलेले आहे
kalamb
kalambkalamb

कळंब (उस्मानाबाद): केंद्र व राज्य सरकारकडून वारंवार 'डिजिटल इंडिया'चा आग्रह केला जात असला तरी प्रत्यक्षात नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक या शासकीय कार्यलयाकडूनच या मोहिमेला खो बसत आहे. सर्व प्रकारच्या खरेदी विक्री व्यवहाराबाबत ऑनलाईन नोंदणी (ई-फायलिंग) अनिवार्य करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक नेटवर्क, विजेची सोय करण्यात आलेली नाही. गेल्या पंधरा दिवसापासून येथील दुय्यम निबंधक (रजिष्ट्री) कार्यलयातील नेटवर्क गटांगळ्या घेत असल्यामुळे दररोज खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प होत आहेत. त्यामुळे नागरिकांना तीव्र मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोदणी महानिरीक्षक व मुद्रांक अधिकाऱ्यांनी खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी नागरिकांना ई-स्टिपिनद्वारे टोकन घेऊन रजिष्ट्री अधिकाऱ्यांची वेळ घेण्याचे आदेश ६ एप्रिल रोजी देण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदी विक्री चे व्यवहार करण्यासाठी दिवसभरात ३० हून अधिक ऑनलाइन टोकन घेण्यात येतात. मात्र, दिवसभरात तासंतास सर्व्हर डाउन होत असून पावसाळ्याचे दिवस असल्याने तासंतास वीजपुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे नागरिकांना रांगेत उभे राहून मोठ्या मनःस्ताप ना सामोरे जावे लागत आहे. तांत्रिक दोष निर्माण होत असल्याची ओरड वरिष्ठ रजिष्ट्री अधिकाऱ्याकडे करून ही दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे.

kalamb
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या उस्मानाबादच्या दौऱ्यावर

सध्या कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्याने खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी येथील दुय्यम निबंधक (रजिष्ट्री) कार्यलयात गर्दी वाढली आहे. सर्वसामान्यांच्या स्वप्नातल्या घराची खरेदी, जमीन मिळकत, प्लॉट खरेदी विक्री, हक्कसोड पत्र याशिवाय जमीन खरेदी विक्री व्यवहारात दस्त नोंदणी करणे हे महत्वाचे आहे. यासाठी शासनाने दुय्यम निबंधक कार्यलयात व्यवस्था केली आहे. मात्र, डिजिटल इंडिया म्हणून ओळख झालेल्या महाराष्ट्रात इंटरनेट सेवा कोलमडून पडत आहे.

सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम महाराष्टात

राज्यातील रजिष्ट्री कार्यलयाला नेटवर्क कनेक्टिव्हिटी देण्याचे काम राष्ट्रीय सूचना केंद्राकडे (एनाआयसी) देण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व्हर डाउन मधील दोष सुधारणे यांची जबाबदारी आहे. जिओ कंपनीचे नेटवर्क घेण्याचे नियोजित असून यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था शहरात खोदकाम करू देत नसल्याचे जिल्हा मुंद्राक अधिकारी श्री महिणकार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com