काय सांगता..! कृषी विभागाच्या बदल्यांत `माया` ने पसरले जाळं 

बदली.jpg
बदली.jpg

लातूर : राज्यात सध्या कृषी विभागात बदल्यांचा मौसम सुरु आहे. राज्यातील पाच विभागात कृषी कर्मचाऱयांच्या बदल्या होवून ते रुजूही झाले. पण लातूर कृषी विभाग मात्र याला अपवाद आहे. येथे ना समुपदेशन झाले ना ज्येष्ठता यादी लागली. ता. दहा ऑगस्टपर्यंत बदल्या करणे गरजेचे होते.

पण ता. १४ ऑगस्ट संपली तरी बदल्याचे आदेशच निघाले नाहीत. यात `माया`ने कृषी विभागात `जाळं` विनल्याची चर्चा बदली पात्र कर्मचाऱय़ात असून ते हवालदिल झाले आहेत. आता जरी आदेश निघाले तर ते एक प्रकारे नियमबाह्यच असणार आहेत. त्यामुळे या बदल्या रद्द करण्यासाठी आता कृषी मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

तीनशेवर बदली पात्र कर्मचारी
राज्यात सध्या बदल्यांचा मौसम सुरु आहे.  कृषी विभागातही कर्मचाऱय़ांच्या बदल्या केल्या जात आहेत. यात लातूर कृषी विभागात असलेल्या लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली व परभणी या पाच जिल्ह्यात तीनशेच्या वर बदली पात्र कर्मचारी आहेत. यात कृषी सहायक २३५, कृषी पर्यवेक्षक ३०, सहायक अधिक्षक आठ,वरिष्ठ लिपिक एक, कनिष्ठ लिपिक २२, अनुरेखक १२, वाहन चालक सहा यांचा समावेश आहे.

ना यादी ना समुपदेशन
बदल्याच्या वेळी सेवा ज्येष्ठता यादी व रिक्त जागा वेबसाईटवर प्रसिद्ध झाल्या पाहिजेत. पण ती प्रसिद्धी न करताच बदल्यांचा घाट घातला गेला आहे.  इतकेच नव्हे कर्मचाऱय़ांच्या समुपदेशनाने बदल्यांच्या शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली आहे. कृषी सहसंचालकापासून संबंधित अधिकाऱय़ाचे मोबाईलही स्वीच ऑफ करून बसले आहेत. कर्मचाऱय़ाना उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत.

कोरोनामुळे समपुदेशन घेतले नाही. कर्मचाऱय़ांकडून विकल्प घेतले होते. यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही पुणे कार्यालयाला दिली होती. ता. ११ ऑगस्ट रोजीच सर्व आदेश संबंधीत जिल्ह्याच्या कृषी विभागाला पाठवले आहेत.

आर. टी. मोरे,  अध्यक्ष, नागरी सेवा मंडळ,

बदल्याची नियमित प्रक्रिया आहे. गेल्या दोन दिवसापासून मी कार्यालयात नव्हतो. त्यामुळे बदल्यांच्या आदेशाची प्रत कार्ययाला आलेली आहे की नाही मला माहित नाही.

दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, लातूर

कृषी विभागातील बदल्यांसाठी ता. १० ऑगस्ट ही मुदत होती. आतापर्यंत कृषी सहसंचालक कार्यालयाकडून आदेश येणे अपेक्षीत होते. पण अद्यापपर्यंत हे आदेश आलेले नाहीत.

संतोष आळसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, परभणी

शासनाने दिलेली बदल्यांची मुदत संपून चार दिवस झालेले आहेत. अद्यापपर्यंत आम्हाला पात्र कर्मचाऱयांच्या बदल्यांचे आदेश आलेले नाहीत.

उमेश घाडगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद

संपादन-प्रताप अवचार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com