तीन वर्ष कसे गेले कळले नाही, जिल्हाधिकारी श्रीकांत यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण

Latur Collector G.Sreekant, Sakal
Latur Collector G.Sreekant, Sakal

लातूर : कोरोनाचा मुकाबला करण्यात रात्रीचा दिवस करणाऱ्या प्रशासनाच्या चमूचे नेतृत्व करणारे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांना सध्या रोजचा वार लक्षात राहत नाही. कोणी तरी सांगितले तरच वाराची आठवण येते. याच काळात ता.२९ एप्रिल रोजी त्यांना जिल्ह्यात रूजू होऊन तीन वर्ष पूर्ण झाले. याचीही आठवण कोणी तरी दुसऱ्या दिवशी करून दिली. तीन वर्ष कसे गेले कळले नाही. मात्र, महिन्यापासून कोरोनामुळे प्रत्येक दिवस अवघड जात आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.


महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहे. दिवस कसा गेला कळत नाही. जिल्ह्यात रूजू होऊन तीन वर्ष पूर्ण झाल्याचे मला माहित नव्हते. मी विसरून गेलो. तीन वर्ष कसे उलटले. तीन दिवस झाल्यासारखे वाटतात. जिल्ह्यात चांगला अनुभव आला. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर व दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात मी तीन वर्षापूर्वी रूजू झालो. रूजू होताच पाणीटंचाई व दुष्काळाचा सामना करावा लागला.

दुष्काळमुक्त लातूर जिल्ह्यासाठी तीन वर्षात विविध उपक्रम राबवले. या उपक्रमाला लातूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ते यशस्वी झाले. तीन वर्षातील प्रत्येक दिवसाची एक नाही अनेक आठवणी आहेत. माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी खूप सहकार्य केले व सूचना करून उपक्रमासाठी मदत केली.
लोकांसाठी सुरू केलेल्या सर्व उपक्रम व अभियानाला पाठिंबा दिला. तीन वर्षातील दिवस कसे गेले कळालेच नाही. मात्र, गेल्या महिन्यापासून प्रत्येक दिवस अवघड जात आहे. प्रत्येक दिवशी काय होते, किती पॉझिटिव्ह, किती निगेटिव्ह रूग्ण येतात, याचीच चिंता असते. फार कठीण कालावधीत प्रशासन काम करत आहे. हा काळ सुलभ करण्यासाठी प्रत्येकांनी घरात प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे, असेही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.

लातूरच्या कर्वा उद्योग समुहातर्फे स्वॅब तपासणी बुथची निर्मिती

लातूरचे वेगळे वैशिष्ट्य
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उदगीरचा अपवाद सोडला तर एक जिल्हा म्हणून लातूरने चांगले काम केले. जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी भरीव काम सुरू आहे. यासाठी प्रत्येक उपक्रमाला लोकांनी प्रतिसाद दिला. अॅँटी कोरोना पोलिस हा उपक्रम राज्यभर गाजला. अॅंटी कोरोना फोर्सचा उपक्रम सुरू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपक्रमात तेरा हजार जवानांनी सहभाग देऊन विक्रम केला. हे लातूरचे वेगळे वैशिष्ट्य आहे. माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे प्रशासनाचे सर्व उपक्रम यशस्वी झाले, असेही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com