'पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीस माहिती द्या'

Latur Crop Insurance News
Latur Crop Insurance News

लातूर : जिल्हयात काही ठिकाणी गारपीट व वेगाचा वारा आदी नैसर्गिक आपत्ती घडण्याची शक्यता व त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यास, नुकसानीची पुर्वसूचना विमा कंपनीला द्यावी, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्सखलन, गारपीट, ढगफूटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामूळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते. तसेच काढणीपश्चात नुकसान या जोखीमेअंतर्गत देखील वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते.

फळपिक विमाधारक शेतकऱ्यांना देखील वेगाचा वारा व गारपीट या बाबीकरीता वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते. विमा संरक्षित पिकांबाबत शेतकऱ्यांनी नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासांचे आत संबंधित विमा कंपनीस कळविणे बंधनकारक आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना नोंदवण्यासाठी प्राधान्याने क्रॉप इन्शूरन्स मोबाईल ॲपचा वापर करावा किंवा पूर्वसूचना विमा कंपनी, कृषि, महसूल विभाग, बँक किंवा टोल फ्री क्रमांकाव्दारे देण्यात यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा प्रतिनिधी संतोष भोसले, भारतीय कृषि विमा कंपनी व फळपिक विम्या संदर्भात जिल्हा प्रतिनिधी अविनाश खेडकर, एच.डी.एफ.सी. अग्रो जनरल इन्शुरन्‌ कंपनी (मो.क्र.8888436054) यांच्याशी किंवा नजीकच्या कृषि विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com