व्यापाऱ्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक : जी. श्रीकांत

G shrikant.jpg
G shrikant.jpg

लातूर : शहर व परिसरातील वीस गावांत एक ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन गुरूवारपासून (ता. १३) शिथिल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मंगळवारी (ता. ११) जारी केला. मात्र, दुकान उघडण्यासाठी व्यापारी तसेच दुकानात काम करणाऱ्या कामगारांना कोरोना तपासणीचे बंधन घालण्यात आले आहे. यातून बाजारापेठेतून कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्याचा प्रयत्न असून तपासणी न करता दुकान उघडणाऱ्या व्यापाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान लॉकडाऊन शिथिल करण्याचे पहिले पाऊल म्हणून १३ ते १६ ऑगस्ट या काळात किराणा, भाजीपाला, फळे, बेकरी, मांस, मच्छी व अंडी विक्रीची दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात या काळात सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. १३ ऑगस्टपासूनच बँकांमधील सर्व प्रकारचे व्यवहाल नियमित सुरू ठेवण्यात येणार असून १७ ऑगस्टपासून ३१ सरकारने बंदी घातलेल्या सेवा व व्यवसायांव्यतिरिक्त सर्व व्यवहार सुरू ठेवता येणार आहेत. 

जिल्ह्यात १५ ते ३१ जुलै या काळात संपूर्ण लॉकडाऊन केल्यानंतर एक ऑगस्टपासून लातूर शहर व परिसरातील वीस गावांत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला होता. शहरातील व्यापारी व व्यवसायसिकांचा या लॉकडाऊनला तीव्र विरोध होता. यामुळेच लॉकडाऊन मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. यातूनच गुरूवारपासून शहर व वीस गावांतील लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असून उर्वरित काळातही सर्व जिल्ह्यांसाठी एकच लॉकडाऊन राहणार आहेत. यात सर्व अत्यावश्यक नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहेत.

अन्य सर्व अस्थापना, बाजारपेठा व दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात काळात सुरू रहाणार आहेत. मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स सुरू राहणार असून त्यातील फुड कोर्ट व रेस्टॉरंटच्या सेवा घरपोच आहेत. सिनेमागृह व शैक्षणिक संस्था बंदच राहणार असून जिल्हाअंतर्गत एसटीची प्रवासी वाहतुक ५० टक्के क्षमतेने तर सलुन व केशकर्तनालये बंधनासह सुरू राहणार आहेत. वैयक्तिक खेळ खेळता येणार असून तरण तलाव बंदच राहणार आहेत.

फक्त दुचाकी वाहतुकीस मुभा

लॉकडाऊन उघडल्यानंतर हेल्मेट व मास्क वापराचे बंधन घालून दुचाकी वाहतुकीस परवानगी देण्यात आली असून तीन व चारचाकी वाहतुक केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच सुरू राहणार आहे. यात दुचाकी चालवणाऱ्याला हेल्मेट तर मागे बसलेल्या व्यक्तीला मास्क घालावा लागणार आहे. मंगल कार्यालयासह लग्न व स्वागत सभारंभांवर बंदी कायम असून अंत्यविधीसाठीही पूर्वीप्रमाणे वीस व्यक्तींनाच उपस्थित रहाता येणार आहे.

Edit-Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com