पेरणी
पेरणीsakal

औरंगाबाद : वापसा नसल्याने रब्बी पेरण्या खोळंबल्या

अतिवृष्टीने वापसा नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.

औरंगाबाद : रब्बी हंगामातील पेरणीसाठी ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा लाभदायी असतो. परंतु लांबलेल्या पावसाने व आतापर्यंतच्या झालेल्या अतिवृष्टीने वापसा नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. कृषी विद्यापीठाने ज्वारीसह हरभरा, जवस, करडई आदी बियाणे उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांनी सर्व प्रकारच्या बियाण्यांची तजवीज करून ठेवली आहे. पावसाने उघाड दिल्यावर आणि वापसा झाल्यानंतर अजूनही पेरणी करता येणे शक्य असल्याचे विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे प्रमुख प्रा. रामेश्वर ठोंबरे यांनी सांगितले.

यावर्षी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अतिवृष्टीने खरिपातील सर्वच पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या कापसाच्या पावसाने वाती होत आहेत. काढलेला कापूस वाळवायला ऊनही पडत नाही. ओल्या कापसाची व्यापारी बेभाव खरेदी करीत आहेत. तर दुसरीकडे रब्बीची पेरणी खोळंबली आहे. प्रा. ठोंबरे म्हणाले, की वापसा झाल्यास पेरणीला वाव आहे. शेतकऱ्यांच्यादृष्टीने हस्त नक्षत्रात रब्बी ज्वारीची पेरणी उपयुक्त ठरते.

पेरणी
जालना : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

तसा अनेक वर्षांचा अनुभव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पहिले चार दिवस पाऊस येण्यासाठी हानिकारक मानले जातात. कारण पडलेल्या पावसामुळे जमीन दगडासारखी टणक बनते, असे शेतकऱ्यांचे मत आहे. मात्र, चार दिवस काय संपूर्ण हस्त म्हणजेच हत्तीचा पाऊस सर्वत्र जोरदार कोसळला. अद्यापही तो थांबलेला नाही. चित्रा नक्षत्र सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला.

१ ऑक्टोबरपासून १५ ऑक्टोबरपर्यंत रब्बी ज्वारीची पेरणी करता येते. या वर्षी अतिपावसामुळे वापसा स्थिती महत्त्वाची राहील. कारण ओल्यात पेरणी केली तर त्या जमिनी टणक बनतात. त्यामुळे पीक व्यवस्थापन करण्यासाठी अडचणी येतात. रब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी वापसा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

पेरणी
नांदेड : शेतात पिकले तेवढे वाहून गेले; एका रात्रीत झाले होत्याचे नव्हते

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत पवार म्हणाले, की वीस वर्षांपूर्वी शेतकरी आवर्जून खरीप पीक न घेता शेत तसेच ठेवून त्यात रब्बी पीक म्हणून ज्वारीची निवड करत होते. वर्षभर जनावरांसाठी चारा आणि कुटुंबासाठी अन्न म्हणून मोठ्या ज्वारी पिकाकडे शेतकरी पाहत. मात्र, काही वर्षात वाटण्या झाल्या.

जमिनीचे तुकडे - तुकडे झाल्यामुळे सर्व क्षेत्र खरिपात पेरणीसाठी वापरले जाते. त्यामुळे आता कुठेही नुसत्या रब्बीसाठी क्षेत्र रिकामे ठेवणे शक्य होत नाही. काहीजण पाखरांच्या उपद्रवामुळे रब्बी ज्वारी पेरत नाहीत. अशा या परिस्थितीतही पावसाने उघडीप दिल्यास, वापसा झाल्यास रब्बी ज्वारीसह करडई, हरभरा आदी पिकाची पेरणी करता येणे शक्य असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com