मुंबईतील पावसाने रेल्वेसेवेवर परिणाम

Railway
Railway

औरंगाबाद - मुंबईत होत असलेल्या धुंवाधार पावसाने मराठवाड्याच्या रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे. मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावल्याने तिथे सखल भाग आणि रेल्वे मार्गात पाणी साचल्याने पश्‍चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळित झाली आहे. 

मुसळधार पावसाने मुंबईकरांबरोबर मराठवाड्यातील प्रवाशांची दैना झाली आहे. मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वेसेवेवर झाल्याने दोन्ही बाजूंची तपोवन एक्‍स्प्रेस रद्द करावी लागली. तर नंदीग्राम एक्‍स्प्रेस नाशिक येथून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे मनमाड, मुंबईकडे जाणाऱ्या व तेथून औरंगाबादकडे येणाऱ्या रेल्वे उशिराने धावल्या. पावसाने मंगळवारी (ता. दोन) (गाडी क्र. १७६१७-१७६१८) मुंबई-नांदेड आणि नांदेड-मुंबई या दोन्ही तपोवन एक्‍स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर एक जुलैला सुटलेली गाडी (क्र.११४०२) नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्‍स्प्रेस नाशिकपर्यंतच सोडण्यात आली. दोन जुलैला सुटणारी गाडी (क्र.११०१) मुंबई ते नागपूर नंदीग्राम एक्‍स्प्रेस नाशिक येथूनच सोडण्याचा ऐनवेळी निर्णय घेण्यात आला. याशिवाय जनशताब्दी एक्‍स्प्रेस विलंबाने धावली.

आज तपोवन, देवगिरी रद्द 
मुंबईतील जोरदार पावसामुळे तीन जुलै रोजी मुंबई येथून सुटणारी गाडी मुंबई-नांदेड तपोवन एक्‍स्प्रेस आणि मुंबई ते सिकंदराबाद देवगिरी एक्‍स्प्रेस या दोन्ही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com