narendra modi
narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यातील सरपंचांना पत्र

हिंगोली : पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठविण्यासाठी गावपातळीवर आवश्यक उपाय योजना करून स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर पाणी अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सरपंचांना पाठविले आहे. त्यानुसार आता शनिवारी (ता. 22) ठिकठिकाणी ग्रामसभा घेऊन यापत्राचे वाचन केले जाणार आहे. 

या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी सरपंचांना पाठविलेल्या पत्रात नमुद केले की, पावसाळा सुरु होत असून पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त साठा करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेत, नदी, ओढ्यांवर बांध घालावे. तसेच जलाशय वाढण्यासाठी प्रयत्न करावे. त्यातून शेतातील पाणी शेतात तर गावातील पाणी गावात साठविण्यासाठी प्रयत्न करावे. राज्यातील प्रत्येक गावांमधून पाणी साठविण्याचे प्रयत्न केल्यास प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवणुक होईल. या पाण्याचा उपयोग गावासाठी व शेतीसाठी करता येईल असेही यापत्रात नमूद केले आहे. 

यासाठी ग्रामसभा बोलावून प्रत्येक गावकऱ्यांना पत्र वाचून दाखवावे तसेच या मुद्दयावर व्यापक चर्चा करून ग्रामीण भागात सर्व जण एकत्र येऊन पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी प्रयत्न करावे. देशात स्वच्छता अभियानात मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांनी सहभाग घेतल्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाले आहे. त्यानुसार पाणी या विषयावर आधारित अभियानाला जन आंदोलनाचे स्वरुप देऊन अभियान यशस्वी करावे असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी पत्राद्वारे केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com