नाथसागरातून पाणी उपसा घटला

औरंगाबाद - नाथसागरातील पाणीसाठा कमी होत असल्याने ऍप्रोच कॅनॉलच्या नाथसागरातील पाण्याच्या बाजूने महापालिकेने खोदकाम सुरू केले आहे. त्यामुळे कॅनॉलमधील पाण्याचा प्रवाह वाढणार आहे.
औरंगाबाद - नाथसागरातील पाणीसाठा कमी होत असल्याने ऍप्रोच कॅनॉलच्या नाथसागरातील पाण्याच्या बाजूने महापालिकेने खोदकाम सुरू केले आहे. त्यामुळे कॅनॉलमधील पाण्याचा प्रवाह वाढणार आहे.

औरंगाबाद - जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला असला तरी दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नाथसागरातील पाणीपातळी दिवसेंदिवस खोलवर जात असून, महापालिकेच्या पंपापर्यंत येणारे पाणी कमी-कमी होत आहे. पाण्याचा दाबच नसल्यामुळे तब्बल १० एमएलडीने पाणी उपसा घटला आहे. दरम्यान, ॲप्रोच कॅनॉलच्या खोलीकरणाचे काम सोमवारपासून (ता. आठ) सुरू करण्यात आले आहे. 

गतवर्षीच्या भीषण दुष्काळानंतरही यंदा वरुणराजाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जायकवाडी धरणातील मृत जलसाठाही झपाट्याने कमी होत आहे. महापालिका गेल्या दोन महिन्यांपासून मृत जलसाठ्यातून पाणी उपसा करीत आहे. मात्र, सध्या कालव्याला येणारे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे भिस्त फक्त ॲप्रोच कॅनॉलवरच आहे. ॲप्रोच कॅनॉलला येणारे पाणीदेखील कमी होत असल्यामुळे पाणी उपसा दहा एमएलडीने घटला आहे. दरम्यान, फ्लोटिंग पंपामध्ये अडकणारे गवत आणि गाळ यामुळे पाणी उपसा वारंवार बंद करावा लागत आहे. धरणात मुबलक पाणी असताना महापालिका १५० ते १५५ एमएलडी पाणी उपसा करते. मृत जलसाठ्यातून सुरवातीला १२० ते १२५ एमएलडी एवढा पाणी उपसा होत होता. आता त्यात पुन्हा घट झाली आहे. मृत जलसाठ्यातूनही आतापर्यंत २०६.७५ दलघमी इतका पाणी उपसा करण्यात आला आहे. मृत जलसाठ्याची पातळी ४५३.९३८ मीटर इतकी झाली आहे. ॲप्रोच कॅनॉलसाठी पाणीपातळीची मर्यादा ४५३.५० मीटर एवढी आहे.

सिडकोत तब्बल सात दिवसांआड पाणी 
औरंगाबाद - संपूर्ण शहराला समान पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे प्रशासनाने सिडको-हडकोसह इतर भागांत सात दिवसांआड पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाणीटंचाईत आणखी भर पडणार आहे. 

राज्यमंत्री अतुल सावे यांनी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन संपूर्ण शहराला समान पाणी देण्याचे निर्देश दिले होते. मात्र प्रशासनाने मंगळवारपासून (ता. आठ) हडको, सिडको, बायजीपुरा, संजयनगर, जिन्सी परिसराच्या काही भागांत पाणीपुरवठा पाच ते सहा दिवसांआडवरून थेट सात दिवसांआड तसेच पुंडलिकनगर आणि शिवाजीनगर भागाला दोन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे लोटण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com