file photo
file photo

लोक जोड्याने मारतील या भीतीनेच सत्ताधारी बांधावर-राजू शेट्टी

औरंगाबाद : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरू आहेत. विरोधक शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतरच सत्ताधाऱ्यांना जाग आली. शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणीस गेलो नाही तर लोक जोड्याने मारतील, याच भीतीपोटी सत्ताधारी पाहणी करीत आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. पाच) केला. 


श्री. शेट्टी यांनी जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्‍यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, विधानसभेच्या निकालानंतर भाजप-शिवसेना सत्ता स्थापनेत व्यस्त आहे.

आम्ही विरोधकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. तेव्हा सत्ताधाऱ्यांना जाग आली. शेतकऱ्यांच्या बांधावर नाही गेल्यास लोक आपल्याला जोड्याने मारतील या भीतीपोटीच सत्ताधारी बांधावर जात आहेत, असा टोला शिवसेना-भाजपला लगावला. या भेटीत शेतकऱ्यांनी नुकसानीची व्यथा, राजू शेट्टी यांच्या समोर मांडल्या. 

पाशा पटेलांना स्वत:च्या भवितव्यांची चिंता 
शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशातच राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटलेही आता कुठे दिसत नाहीत. या विषयी सिल्लोडच्या दौऱ्यावर असलेले राजू शेट्टी म्हणाले, पाशा पटेल यांना स्वत:च्या भवितव्याची चिंता वाटेत असेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्‍न त्यांना महत्त्वाचे वाटत नसतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com