सलग पाच वर्षांपासून मोहाकरांची परवड

मोहा (ता. कळंब) ः वरुणराजाच्या वक्रदृष्टीमुळे पावसाळ्यातही पाणीप्रश्‍न भेडसावत आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास टॅंकरच्या प्रतीक्षेत थांबलेले गावातील नागरिक.  सलग पाच वर्षांपासून मोहाकरांची परवड
मोहा (ता. कळंब) ः वरुणराजाच्या वक्रदृष्टीमुळे पावसाळ्यातही पाणीप्रश्‍न भेडसावत आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास टॅंकरच्या प्रतीक्षेत थांबलेले गावातील नागरिक. सलग पाच वर्षांपासून मोहाकरांची परवड

उस्मानाबादः  चला, तांबड फुटलंया... उचला घागरी, पाइप घ्या, पिंप घ्या... असे म्हणत गावातील युवक, लहान मुले अन्‌ महिला रस्त्याच्या दिशेने धावत सुटतात. जिल्ह्यातील अनेक गावांत असे चित्र पाहायला मिळत आहे. मोहा (ता. कळंब) येथे गेल्या चार वर्षांत टॅंकरने गावची पाठ सोडलेली नाही. यंदाही अत्यल्प पाऊस झाल्याने गावकऱ्यांना टॅंकरने तहान भागवावी लागणार आहे. मात्र, पाणीपातळी खालावल्याने यंदा गावात गंभीर समस्या भेडसावणार आहे, ते म्हणजे पाणी आणायचे कोठून? तालुक्‍यातील बहुतांश साठवण तलाव कोरडेठाक आहेत.


कळंब तालुक्‍यातील मोहा गावाची गेल्या पाच वर्षात टॅंकरने पाठ सोडलेली नाही. यंदाचा पावसाळा संपायला जेमतेम 15 दिवस उरले आहेत. अद्यापही दररोज सकाळच्या प्रहरी टॅंकरचा आवाज ऐकावा लागत आहे. त्यामुळे यंदा पुन्हा दुष्काळाचे ढग गडद दिसत असून, सलग पाचव्या वर्षी गावकऱ्यांना टॅंकरने तहान भागविण्याची वेळ आली आहे. 

गावची लोकसंख्या दहा हजारच्या पुढे आहे. दररोज सकाळी गावात टॅंकर येते. पहाटे सहा ते सातच्या दरम्यान टॅंकर येताच झुंबड उडते. घरातील युवक, मुली, महिला टॅंकरच्या दिशने धावतात. एका हातात पाइप, तर दुसऱ्या हातात घागर घेऊन येणाऱ्या महिला. तर कोणी दोन-दोन घागरी घेऊन धावतात. या सर्वांच्या मागे-मागे येतात ती लहान मुले अन्‌ वयोवृद्ध माणसे. आपल्याला एखादी घागरभर पाणी मिळेल, यासाठी टॅंकरच्या जवळच उभी राहतात. कोणीतरी एखादी घागर भरून देईल, या अपेक्षेने इतरांकडे मदतीची याचना सुरू असते. कधी पुरेसे पाणी मिळते, तर कधी एखादी घागर भरून मिळते. त्यावरच समाधान मानत ज्येष्ठ नागरिक आपल्या घरी निघून जातात. 

पाणीपुरवठा योजना लाटली? 
गावात लाखो रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना राबविली आहे. मात्र, योजनेतून ठेकेदार मालामाल झाला. मात्र, गावाला थेंबही पाणी मिळाले नाही. आता योजना होत्याची नव्हती झाली आहे. कुठे पाइप तुटले आहेत, तर कुठे चोरीला गेले आहेत. तर विहिरींचीही नासधूस झाली आहे. जनतेच्या हितासाठी योजना राबविण्याऐवजी केवळ ठेकेदाराचे हित लक्षात घेऊन योजना राबिल्याने योजना होत्याची नव्हती झाली आहे. मात्र, प्रशासनाला याची चौकशी करण्याची हिंमत दाखविता आली नाही. अधिकारी, पदाधिकारी यांनी संगनमत करून गावातील नागरिकांना टॅंचाईच्या खाईत लोटल्याचे चित्र आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com