येडशीकरांची तहान टॅंकरवरच

येडशी : पावसाळा संपत आला तरीही गावात टॅंकरने सुरू असलेला पाणीपुरवठा.
येडशी : पावसाळा संपत आला तरीही गावात टॅंकरने सुरू असलेला पाणीपुरवठा.

येडशी (जि. उस्मानाबाद) : पावसाळा संपत आला तरीही ग्रामस्थांना टॅंकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. सद्य:स्थितीत गावात टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. भीषण पाणी टंचाईने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. 


गेल्या महिन्यात संततधार पाऊस झाला. मात्र, दमदार पावसाअभावी जलस्रोत अद्याप कोरडेच असल्याने पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई जाणवत असल्याने शेतकरी, पशुपालकांवर मोठ्या नैसर्गिक संकटांचा सामना करण्याची वेळ आली आहे. 


संततधार पावसाने पिके चांगली आली. पण, मोठा पाऊस नसल्याने नद्या, ओढे कोरडेच आहेत. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात असणाऱ्या तीन ते चार हजार गायी, म्हशी, बैल, शेळ्या, इतर पाळीव प्राण्यांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात महापुराचे आसमानी संकट, तर मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतकरी, नागरिक मोठ्या अडचणीत सापडला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com