ईव्हीएममध्ये नव्हे तर विरोधकांच्या डोक्‍यात बिघाड ः फडणवीस

फुलंब्री ः महाजनादेश यात्रेनिमित्त आयाेजित सभेप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे.
फुलंब्री ः महाजनादेश यात्रेनिमित्त आयाेजित सभेप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे.

फुलंब्री, ता.28(जि.औरंगाबाद) : विरोधक नेहमीच ईव्हीएम मशीन वरून आक्रमक होतात, मात्र ईव्हीएममध्ये बिघाड नसून ती विरोधकांच्या डोक्‍यात बिघाड झाली असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फुलंब्री येथे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सभेचे आयोजन बुधवारी (ता.28) करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


श्री.फडणवीस म्हणाले की, मागील पंधरा वर्षे कॉंग्रेसची सत्ता आली तेव्हा ईव्हीएम चांगले होते. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासूनच ईव्हीएम बिघाड कसे असू शकते..? सुप्रिया सुळे निवडणून आल्या तेथे ईव्हीएम चांगले अन्‌ इथे रावसाहेब दानवे निवडून आले तर ईव्हीएममध्ये बिघाड झाली, म्हणून ओरड विरोधक करीत आहे. प्रत्यक्षात मात्र ईव्हीएममध्ये बिघाड नसून विरोधकांच्या डोक्‍यातच बिघाड असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाजनादेश यात्रा ही जनतेच्या दर्शनासाठी आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीला उमेदवारही मिळत नाही. ज्या पक्षाचा अध्यक्षच राजीनामा देतो त्या पक्षाची आणखी दुर्दशा काय असू शकते. आमच्या महाजनादेश यात्रेला मैदान पुरत नाही कॉंग्रेस राष्ट्रवादीचा मंडपही भरत नाही अशी शोकांतिका कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांची आहे. कॉंग्रेसने 15 वर्षांत 20 हजार कोटी रुपये दिले तर भाजपचे केवळ पाच वर्षात 50 हजार कोटी शेतकऱ्यांना दिले असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी तालुक्‍यातील काही ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केला. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.


राष्ट्रवादीची प्रेत यात्रा - दानवे
भाजपने महाजनादेश यात्रा सुरू केल्याचे पाहून राष्ट्रवादीनेही एक यात्रा सुरू केली. महाजनादेश यात्रेत हजारोच्या संख्येने लोकांची गर्दी होते. तर राष्ट्रवादीची प्रेत यात्रा असून त्या यात्रेत कोणीही जायला तयार नसल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.


पंधराशे कोटींची विकास कामे - बागडे
फुलंब्री विधानसभा मतदारसंघात पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केलेली आहे. 1500 कोटी रुपयांचे कामे मतदार संघात करण्यात आलेले आहे. 21 हजार स्वच्छतागृह बनवून तालुका पाणंदमुक्त केलेला आहे. 100 कोटींचा पीकविमा दिला असून 219 कोटीचे पिकांना नुकसान भरपाई दिली. ग्रामीण भागातील 250 किमीचा रस्ता मतदारसंघात करण्यात आला असल्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com