कळमनुरीत पिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

Crops
Crops

कळमनुरी : कळमनुरी तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व पुर परिस्थिती यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची संयुक्त पाहणी करून पंचनामे करावेत तसेच त्याचा  अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी रविवारी (ता. 29) दिले आहेत.

कळमनुरी तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने चांगला धुमाकूळ घातला आहे. शेतात काढून ठेवण्यात आलेल्या सोयाबीनला कोंब फुटले असून सोयाबीनची किमान पंचवीस ते तीस टक्के नुकसान झाले आहे. तालुक्याचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याशिवाय कापूस व इतर पिकांनाही परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे काही भागातील पिके पुराखाली सापडली असून पुरामुळे शेतजमीनही खरडून गेली आहे. या भागात आमदार संतोष बांगर, माजी खासदार शिवाजी माने, तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे, पंचायत समिती उपसभापती अजय सावंत, उपसरपंच विजय बोंढारे यांच्या पथकाने परिसरात पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर तहसीलदार वाघमारे यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांनी संयुक्तपणे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com